शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वळणावरची ती भिंत देतेय अपघाताला निमंत्रण

By admin | Updated: November 5, 2014 00:05 IST

संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब

देवरुख : मुंबई - गोवा महामार्गावरील अतिक्रमणांना धोबीघाट दाखवणाऱ्या बांधकाम विभागाने स्वत: बांधलेली संगमेश्वर विश्रामगृहाजवळची भिंत हटविण्यास मात्र विलंब लावला आहे. ही भिंत अपघाताला कारणीभूत ठरत असून, बांधकाम विभागाने ती तातडीने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र. १७वर संगमेश्वरजवळ असलेले शासकीय विश्रामगृह १०० वर्षांचे झाले आहे. शास्त्री आणि सोनवी नद्यांच्या संगमासमोरच विश्रामगृह आहे. येथे फार पूर्वी काळ्या दगडांचा वापर करून संरक्षक भिंंत उभारण्यात आली आहे. पूर्वी या महामार्गावरची वाहतूक मर्यादित होती. त्यावेळी या भिंतीचा अडसर जाणवला नाही. आता मात्र महामार्गावरची वाहतूक वाढल्याने या भिंतीचा मोठा त्रास दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या भिंतीलाच लागून धोकादायक आणि अरुंद वळण आहे. भिंत महामार्गाला टेकल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी बाजूपट्टीही शिल्लक राहिलेली नाही. संगमेश्वरकडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या वाहनचालकांना समोरचे काहीच दिसत नाही. रत्नागिरीकडून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनचालकांना समोरुन एखादे वाहन आल्यास आपल्या वाहनावर ताबा मिळवणे कठीण जाते. यामुळे आजवर अनेक अवजड वाहने थेट नदीत कोसळली आहेत. आजवर येथे झालेल्या अनेक अपघातात सहा जणांना प्राण गमवावे लागले असून, १५पेक्षा अधिक प्रवासी जायबंदी झाले आहेत. मुंबईहून रत्नागिरीकडे जाणारी वाहने शासकीय विश्रामगृहाजवळील या धोकादायक भिंंतीजवळ रस्त्याच्या उजव्या बाजूला ओढली जात असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांवर आपटूनही येथे अनेक अपघात घडले आहेत. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे पादचारी आणि वाहनचालकांनी ही भिंंत तातडीने हटविण्याची मागणी अनेकदा केली आहे. मात्र, या मागणीकडे लक्ष द्यायला बांधकाम विभागाला वेळ नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. ही भिंंत हटवायची नसेल तर नदीच्या बाजूने काँक्रीटची संरक्षक भिंंत उभारून वळण रुंद करणे शक्य असतानाही बांधकाम विभाग दोन्ही गोष्टींचा विचारच करत नसल्याने याठिकाणी घडणाऱ्या अपघातांचा धोका कायम राहिला आहे. (प्रतिनिधी)