शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माहिती कार्यालय ६३ वर्षांनी हक्काच्या जागेत...

By admin | Updated: March 1, 2015 23:14 IST

जिल्हाधिकारी कार्यालय : पाण्याचा प्रश्न मात्र अजूनही प्रलंबितच

रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही नव्या इमारती सज्ज झाल्या असून, काही कार्यालये आता या इमारतीत स्थलांतरित होऊ लागली आहेत. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे भाड्याच्या जागेत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालयाला ६३ वर्षांनंतर आता हक्काची जागा मिळाली आहे. गुरुवारपासून हे कार्यालय या नव्या इमारतीत आले आहे. गत वर्षी या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १५ आॅगस्ट २०१३ रोजी या इमारतींचे उद्घाटन होणार असे म्हटले जात होते. या नव्या दोन इमारतीत कोणकोणती कार्यालये ठेवावी, यांचे वाटपही झाले आहे. या दोन्ही बिल्डींगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डींगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये ठेवण्यात येणार आहेत. ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत. सर्व कार्यालयांचा कारभार या दोन इमारतींमुळे एकछत्री होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रक तयार करताना त्यात वीज आणि पाणीपुरवठा या दोन मुख्य गोष्टीच नमूद करायला विसरले. त्यामुळे या दोन्ही इमारती तयार होऊनही त्यात कार्यालये स्थलांतरीत झाली नव्हती.गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय या नव्या इमारतीत आले. मात्र, या दोन्ही इमारतीत विद्युत पुरवठा आणि पाण्याची काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने या कार्यालयाला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखेर या बाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नेहमीप्रमाणे सकारात्मक भुमिका घेत बांधकाम विभागाच्या चुका दुरूस्त करून पाणी व विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे आता पहिल्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळापाठोपाठ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पहिल्या मजल्यावर आले आहे, तर गुरूवारपासून जिल्हा माहिती कार्यालयानेही या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर आपल्या नियोजित जागेत पदार्पण केले आहे.सध्या या इमारतींचा विजेचा प्रश्न सुटला असला तरी पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मात्र, लगतच बोअरवेल खोदण्यात आली असून, तिथून या सर्व कार्यालयांना दोन - तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरू होणार आहे. काही कार्यालयांना या इमारतीत स्थलांतरीत होण्यासाठी, तसेच फर्निचर आदी खर्चासाठी निधी मंजूर झाला नसल्याने त्यांचे स्थलांतर लांबणार असल्याचे मत काहीनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)