शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’

By admin | Updated: July 7, 2015 21:15 IST

महेंद्र नाटेकर : नाटकाचे कणकवलीत प्रकट वाचन

कणकवली : कोकण विकास म्हणजे केवळ धरणे, पाटबंधारे, बंदर, रेल्वे, रस्ते, कारखाने, उद्योगधंदे, शिक्षण, इत्यादींचा विकास करणे नव्हे तर हा विकास करीत असताना कोकणी माणूस मध्यवर्ती धरून विकास केला पाहिजे; अन्यथा या विकासाचा लाभ कोकणाबाहेरील लोक घेतील नव्हे घेत असून, कोकणी माणूस देशोधडीला लागत आहे. तेव्हा ‘कोकण विकास म्हणजे कोकणी माणसाचा विकास’ ही संकल्पना लक्षात घेऊन ‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’ या नाटकाचे लेखन केले आहे, असे मत प्रा. महेंद्र नाटेकर यांनी व्यक्त केले.‘अरे, खय न्हेवन ठेवलास कोकण आमचा?’ या नाटकाचे प्रकट वाचन येथील वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यघरात झाले. यानंतर झालेल्या चर्चेला उत्तर देताना प्रा. महेंद्र नाटेकर यांनी नाट्य लेखनामागील आपली प्रेरणा स्पष्ट केली. यावेळी वामन पंडित, नाट्य दिग्दर्शक दीपक परब, राजेश कदम, मनोहर पालयेकर, मोहन काणेकर, डॉ. अनिल तेंडुलकर, डॉ. संदीप नाटेकर, वामन तर्फे, नाटककार पाताडे, विश्वनाथ केरकर, श्रृतिशया डोंगरे, डॉ. विद्याधर करंदीकर, वाय. पी. राणे, शिवाजीराव देसाई, वाय. जी. राणे, सुरेश पाटकर, अशोक राणे, आदी उपस्थित होते.प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, कोकणी लोकांवर महाराष्ट्र शासन प्रचंड अन्याय करीत असून, ही अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांची अस्मिता जागृत करणे हाही नाट्यलेखनाचा उद्देश आहे. ती कोकणी माणसाच्या विकासाबरोबरच त्याच्या स्वाभिमानाची जपणूक करण्यासाठी स्वतंत्र कोकण राज्यच हवे, असे त्यांनी प्रतिपादन केले.नाट्यदिग्दर्शक दीपक परब, राजेश कदम व प्रा. महेंद्र नाटेकर यांनी नाटकाचे प्रभावी वाचन करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कोकणावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडताना हृदयाला हात घातला गेला. शिक्षण, निवडणुका, वैद्यकीय सेवा, रस्ते, राजकारण, शेती, बागायती, मच्छिमारी, बेरोजगारी, क्रीडा, राजकारणी, आदींवर प्रकाशझोत टाकून दंभस्फोट केला आहे, अशा बहुसंख्य रसिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.नाट्यदिग्दर्शक दीपक परब म्हणाले, या नाटकातून कोकणातील तरुणांच्या व्यथा, वेदना व्यक्त झाल्या आहेत. नाटक प्रत्यक्ष रंगमंचावर आल्यानंतर पालकांना याचा गांभीर्याने विचार करावा लागेल.नाटककार करंदीकर म्हणाले, कोकण राज्यनिर्मितीसाठी विविध माध्यमातून हा विषय मांडला जात आहे. प्रा. महेंद्र नाटेकर यांनी हा विषय नाटकाच्या माध्यमातून एकोणीस प्रवेशातून उत्तमरीतीने हाताळला आहे.डॉ. अनिल तेंडुलकर म्हणाले, हे नाटक तरुणांसाठी मार्गदर्शक असल्याने त्यांच्यासाठी या नाटकाचे प्रयोग ठिकठिकाणी आयोजित करणे आवश्यक आहे. डॉ. संदीप नाटेकर म्हणाले, नाटक वाचन प्रभावी झाले. कोकणातील विविध समस्या तीव्रतेने थोडक्या वेळात समजल्या. या नाटकाशिवाय अनेक एकांकिका सादर झाल्यास अधिक बरे होईल.गंगाराम साटम म्हणाले, कोकण राज्याबद्दल माझ्या मनात बऱ्याच शंका होत्या; पण आता त्या दूर झाल्या. कोकण राज्य झालेच पाहिजे. कलात्मकतेबरोबर माहितीचा आनंद मिळाला. यावेळी पालयेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)