शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

सह्याद्री पट्ट्यात पुन्हा दमदार पाऊस, ९५ टक्के भातपीक वाया

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 5:54 PM

ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते.

सिंधुदुर्ग : ऑक्टोबर महिन्यात कोसळलेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील भातशेतीचे होत्याचे नव्हते केले होते. नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा सुरू असतानाही अजूनही पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. सोमवारी सह्याद्री पट्ट्यातील कणकवली आणि परिसरात दमदार पाऊस कोसळला आता बुधवारी सह्याद्री पट्ट्यात सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव आदी परिसराला सायंकाळी १ तास पावसाने धुऊन काढले. त्यामुळे भातकापणी पुन्हा एकदा खोळंबली आहे.जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून, शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून मदतीचा हात न दिल्यास शेतकरी देशोधडीला लागणार आहे. अतिवृष्टीने काही भागातील कापलेले भात आणि भातरहित गवतगंजी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. भातशेतीबरोबरच ऊसाच्या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी, आंबेगाव, कोलगाव आदी परिसरात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास मेघगर्जनेसह दमदार पावसाने सुरूवात केली. पुढील तासभर पाऊस कोसळत होता. मागील काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने ऑक्टोबर महिन्यातील अतिवृष्टीतून बचावलेली काहीशी भातशेती ताब्यात घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांकडून केला जात होता. मात्र, गेले दोन दिवस सायंकाळच्या सत्रात कोसळणाºया पावसाने शेतक-यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नुकसानभरपाई अद्यापही नाहीशासनाकडून भातशेती नुकसानभरपाईसाठी पंचनाम्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. ते पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाकडून मदत जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, भातशेतीवर चरितार्थ असणाऱ्या येथील शेतकऱ्यांसमोर यावर्षी निसर्गाची अवकृपा झाली आहे. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस या ठिकाणी पडतो. यावर्षी मात्र, तो अगदी जुलै महिन्याप्रमाणे कोसळत आहे. परिणामी सर्वत्र पाणीच पाणी साचत असून त्यातून मार्ग काढताना शेतकऱ्यांच्या नाकी दम येत आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग