शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 5:01 PM

नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शांतीगिरी महाराजांनाच उमेदवारी मिळणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Nashik Lok Sabha ( Marathi News ): जय बाबाजी भक्त परिवाराचे प्रमुख शांतीगिरी महाराज यांनी आज शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना शांतीगिरी महाराजांनी आपल्या अर्जात शिवसेना पक्ष असा उल्लेख केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे महायुतीकडून महाराजांनाच उमेदवारी मिळणार का, याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आणि नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीवर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "नाशिकच्या उमेदवारीबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. मी तर नाशिकमध्येच आहे. त्यामुळे मुंबईत काय ठरलं, याबाबतची माहिती माझ्याकडे नाही. त्यांच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली होती. मात्र ज्यांना निवडणुका लढवायच्या असतात, ते सर्वांनाच भेटत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे बसून नाशिकमधील महायुतीचा उमेदवार ठरवतील. ते ज्या उमेदवाराचं नाव ठरवतील, त्या उमेदवाराचं काम आम्हा सर्वांना करायचं आहे. तोपर्यंत सर्वजण उमेदवारीसाठी प्रयत्न करतच राहणार," अशा शब्दांत भुजबळ यांनी आपली भूमिका जाहीर केली.

महाराजांचं शक्तिप्रदर्शन

शांतीगिरी महाराज यांनी आज शेकडो भक्तगणांसह शक्तिप्रदर्शन केले. पंचवटीतून निघालेल्या या शोभायात्रेत ते बैलगाडीत बसून सहभागी झाले होते. विशेष म्हणजे महायुतीत उमेदवारीचा घेाळ असताना शांतीगिरी महाराज यांनी शिवसेना असा पक्ष लिहून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली.

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ३ मे पर्यंत त्यांना एबी फॉर्म सादर करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या शुक्रवारी शांतीगिरी महाराज यांनी अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी शिंदेसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते आणि काल रात्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. आज भक्तगणांसह शक्तिप्रदर्शन करीत त्यांनी अर्ज दाखल करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्यानुसार बैलगाडीत बसून ते शोभायात्रेत सहभागी झाले आणि नंतर उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाविकास आघाडीतही संघर्ष

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वर्षभर अगोदर उमेदवारी देण्याचे अश्वासन देऊन ऐनवेळी उमेदवारी बदलल्याने नाराज असलेले विजय करंजकर हे बंडखोरीच्या तयारीत आहेत. आज त्यांनी उमेदवारी अर्ज नेला असून तो भरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांनी बोलवूनही तीन वेळा करंजकर हे त्यांना भेटण्यासाठी गेले नाहीत आणि महायुतीच्या संपर्कात गेल्यानंतर तेथून दावेदारीसाठी त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. आता तेच महायुतीला देखील अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Shantigiri Maharajशांतिगिरी महाराजmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४Chhagan Bhujbalछगन भुजबळnashik-pcनाशिक