शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांवर टांगती तलवार?

By admin | Updated: December 28, 2015 01:00 IST

उच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल : मोठे फेरबदल; शासन निर्णयाची होणार अंमलबजावणी

सागर पाटील- टेंभ्ये --२८ आॅगस्टच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासनाने संचमान्यतेचे निकष जाहीर केले होते. याच्या विरोधात उच्च न्यायालयात काही याचिक दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या सर्व याचिका रद्द केल्या असून, शासनाने जाहीर केलेले निकष योग्य असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शासनाने निश्चित केलेल्या शाळांच्या संरचनेला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. यामुळे जिल्ह्यात माध्यमिक शाळेतील सुमारे ९४ मुख्याध्यापक पदावनत होणार आहेत, तर १५० शिक्षक व अनेक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहेत. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षणामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दि. २८ आॅगस्ट रोजी शासनाने प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार राज्यातील शाळांचे स्तर निश्चित करण्यात आले आहेत. या संरचनेमध्ये विद्यार्थी संख्येवर शिक्षकसंख्या व मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार आहे. माध्यमिक शाळांमध्ये ज्या ठिकाणी इयत्ता आठवी ते दहावीचे वर्ग आहेत, अशा ठिकाणी इयत्ता नववी ते दहावीची पटसंख्या ९०पेक्षा कमी असल्यास त्या शाळेतील मुख्याध्यापक पद अनुज्ञेय राहणार नाही. त्यामुळे सध्या कार्यरत असणाऱ्या व अतिरिक्त होणाऱ्या मुख्याध्यापकांना शिक्षकांच्या रिक्त जागेवर समायोजित करण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकांना वेतन संरक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये या प्रकारे पदावत होणाऱ्या मुख्याध्यापकांची एकूण संख्या सुमारे ९४ इतकी आहे. तुकडी पद्धत बंद करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. जिल्ह्यात सध्या नोंदविलेली विद्यार्थीसंख्या लक्षात घेता १५० शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता आहे. याबरोबरच चतुर्थ श्रेणी कर्मचारी व लिपीकवर्गीय कर्मचारीदेखील मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरणार आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांना याचा फटका बसणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.शिक्षकांवर अन्याय : निर्णयाच्या पुनर्विचारासाठी संघटनांचे प्रयत्न सुरूच राहणारमुख्याध्यापकपदासाठी आठवीची विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरली जाईल, अशी ग्वाही शिक्षण संचालकांनी दिली होती. परंतु शासनाने फक्त नववी, दहावीचीच विद्यार्थीसंख्या ग्राह्य धरल्याने मुख्याध्यापकांवर हे संकट उभे आहे. - विजय पाटील,सचिव - मुख्याध्यापक संघ, रत्नागिरीपदावनत झालेल्यांना प्रथम पदोन्नती!सध्या कार्यरत मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना संबंधित व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे. जिल्हा अथवा व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात समायोजन न झाल्यास वेतनश्रेणी संरक्षित ठेवून शिक्षकांच्या पदावर समायोजित करावे. जिल्ह्यात किंवा संबंधित व्यवस्थापनात सेवानिवृत्ती किंवा अन्य कारणाने मुख्याध्यापकपद रिक्त झाल्यास पदावनत मुख्याध्यापकांना प्रथम पदोन्नती देण्यात यावी. असा आदेश या शासन निर्णयात देण्यात आला आहे. यामुळे पदोन्नतीने मुख्याध्यापक होणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे.शासनाच्या या निर्णयाचे विपरीत परिणाम होणार आहेत. यामुुळे संघटना स्तरावर शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, यादृष्टीने प्रयत्न सुरुच राहणार आहेत.- भारत घुलेजिल्हाध्यक्ष, माध्यमिक अध्यापक संघशिक्षक भरतीला थांबाया निर्णयाची अंमलबजावणी झाल्याने आगामी काही वर्षे तरी राज्यात शिक्षक भरतीला पूर्णत: थांबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर शासनाच्या या आदेशात विनामुख्याध्यापक शाळा कशा चालवयाच्या, याचे कोणतेही निर्देश नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यास जिल्ह्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांची संख्यादेखील कमी होणार आहे.