शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ द्या

By admin | Updated: July 2, 2015 00:30 IST

राधाकृष्णन बी. : बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची रत्नागिरीत आढावा बैठक

रत्नागिरी : जिल्ह्यातील अधिकाधिक अल्पभूधारक आणि गरीब शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळवून देण्याकडे बँकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी बँकांच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत बँक अधिकाऱ्यांना केले. रत्नागिरी जिल्ह्यातील बँकांची जिल्हास्तरीय सल्लागार समिती तसेच जिल्हास्तरीय आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. बँक आॅफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक व्ही. व्ही. बुचे, रिझर्व्ह बँकेचे सहायक सरव्यवस्थापक आर. डब्ल्यू. साळुंखे, नाबार्डचे जिल्हा उपव्यवस्थापक व्ही. एस. पाटील, बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. बांदिवडेकर, जिल्हा उपनिबंधक राजेंद्र महाजन आदींसह विविध बँकांचे जिल्हा समन्वयक, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नैसर्गिक आपत्तीत यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ हजार शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून, यापैकी यंदा पीककर्ज घेतलेल्या जवळपास ३५ हजार शेतकऱ्यांच्या कर्जाचे तीन ते पाच वर्षांच्या मुदत कर्जात रुपांतर करण्यात यावे तसेच या सर्व शेतकऱ्यांचे नवीन कर्ज विनाविलंब मंजूर करावे, अशी सूचना त्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. गेल्या आर्थिक वर्षात कर्ज घेतलेले ३५ हजार शेतकरी हा लाभ मिळण्यास पात्र असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना नवीन कर्ज देताना लवचिक धोरण अवलंबण्यात यावे, आपत्तीग्रस्तांच्या यादीत एखाद्या शेतकऱ्याचे नाव नाही. परंतु त्याच्या कुटुंबातील सदस्याचे नाव आहे आणि त्यांच्या सामाईक सातबारा उताऱ्यावर संबंधित शेतकऱ्याचे नाव असेल, तर त्या शेतकऱ्यालाही नवीन कर्जासाठी पात्र समजण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांना दिली. यासाठी महसूल व शासन यंत्रणा संपूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी दिला. गेली दोन वर्षे कर्जाचे उद्दिष्ट साध्य करण्यात रत्नागिरी जिल्हा पहिला क्रमांक मिळवत आहे. यावर्षीही जिल्ह्याने ३५ हजार शेतकऱ्यांना ३१२ कोटींचे पीककर्ज वाटप करुन १२१ टक्के उद्दिष्ट गाठले व राज्यात पहिला क्रमांक मिळविला, त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, तसेच भविष्यात कर्जाची रक्कम ७०० कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे आवाहन केले. जिल्ह्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर आंब्याची, ९० हजार हेक्टरवर काजूची, तर सुमारे १ लाख हेक्टरवर इतर धान्याची लागवड होते. ही आकडेवारी लक्षात घेतली तर जिल्ह्यात कृषीकर्ज वाटपासाठी मोठी संधी आहे. जिल्ह्यातील विविध बँकांच्या २८४ शाखा या संधीचं निश्चितच सोनं करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी बुचे, साळुंखे, पाटील यांनीही मार्गदर्शन केले. बँक आॅफ इंडियाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एस. बांदिवडेकर यांनी बँकिंग क्षेत्राची सद्यस्थिती मांडली. (प्रतिनिधी)