शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

घाटातील प्रवास जीव मुठीत धरूनच!

By admin | Updated: August 11, 2015 00:20 IST

आंबोली पर्यायी मार्गाच्या प्रतिक्षेत : सरकारला केव्हा जाग येणार; आंबोलीवासीयांचा सवाल

अनंत जाधव- सावंतवाडी -आंबोली घाटातील दरड कोसळून आॅगस्टमध्ये पाच वर्षे पूर्ण झाली. मात्र आंबोली मार्ग अद्यापपर्यंत पर्यायी मार्गाच्याच शोधात आहे. ना नवीन रस्ता, ना दरडीवर ठोस उपाय योजना अशी अवस्था आंबोली घाटाची झाली आहे. दरड कोसळली की तात्पुरती उपाय योजना केली की एक हंगाम निघाला. पुढच्या वर्षी पावसात काय ते पाहू, असे म्हणत अधिकारी व राजकीय नेते पाच वर्षे वेळ मारून नेत आहेत. मात्र, याचा परिणाम आंबोलीच्या पर्यटनावर होत आहे. त्यामुळे येणारा पर्यटक गेली पाच वर्र्षे जीव मुठीत घेऊन येतो आणि कधी जातो, हे त्यालाच माहित नसते.आंबोली घाट हा गोव्यावरून बेळगाव, कोल्हापूरला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तसेच महाबळेश्वरनंतरचे पर्यटन स्थळ म्हणून आंबोलीकडे बघितले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत येतात. मात्र, या ब्रिटिशकालीन घाटाला पहिल्यांदा दरड कोसळण्याचे ग्रहण लागले ते आंबोली घाटात १९७५ साली. यावेळी पहिल्यांदा दरड कोसळली आणि आंबोलीतील वाहतूक तब्बल चार दिवस बंद ठेवण्यात आली होती, असे पूर्वीचे लोक सांगतात. पण त्यानंतर ३५ वर्षे आंबोली घाटाने अनेक उन्हाळे-पावसाळे झेलले. पण या ब्रिटिशकालीन घाटाला कोणताच धोका उद्भवला नाही, हे खरे वैशिष्ट्य. पण आॅगस्ट २०१० पासून आंबोली घाट मात्र चर्चेचा विषय ठरला आहे.सर्वात मोठी दरड कोसळून तब्बल १७ दिवस घाट बंद राहण्याची ही बहुतके पहिलीच वेळ होती. त्यानंतर छोट्यामोठ्या दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. मात्र, आतापर्यंत या घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे दरडी कोसळून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सरकारला जीवितहानी झाली की जाग येणार का, असे वाटू लागले आहे. आंबोलीत आॅगस्ट २०१० मध्ये जेव्हा दरड कोसळली, तेव्हा अनेक नेत्यांनी अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वानीच आंबोली घाट आता जीर्ण झाला आहे, त्या घाटाला पर्यायी रस्ता काढला पाहिजे, आंबोली घाटाची तात्पुरती डागडुजी करूया, पुढच्या वर्षीपासून तळकटमार्गे चौकुळ-कुंभवडे रस्ता काढूया, केसरी-फणसवडे-नेनेवाडी रस्ता सुरू करूया, तर काहींनी पारपोलीतून आंबोलीला सोयीस्कर होईल, असे अनेक पर्यायी रस्त्याचे पर्याय सुचविले. पण यातील एकही पर्याय सत्यात उतरला नाही. तसेच आंबोली घाटाला घालण्यात आलेली स्वित्झर्लंडची जाळीही तात्पुरतीची मलमपट्टीच निघाली. ज्याठिकाणी पूर्वी दरड कोसळली, त्याठिकाणी दरड न कोसळता आता वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत. बांधकाम विभागही लहान-मोठी उपाय योजना करून दिवस ढकलण्याचे काम करीत आहेत. मात्र, कुठेच ठोस कृती होताना दिसत नाही. या मतदार संघाचे तत्कालीन आमदार आता पालकमंत्री झाले असून त्यांनी तर केसरी-फणसवडे -नेनेवाडी मार्ग दोन वर्षात होईल, असे जाहीर केले होते. तर गडहिंग्लजचे तत्कालीन आमदार कै. बाबासाहेब कुपेकर यांनी तळकट मार्गे चौकु-कुंभवडे मार्गाला जोेर लावला होता. तर काहींनी पारपोली मार्ग आंबोलीला जोडा, असे सांगितले. पण यातील एकही मार्ग पूर्ण झाला नाही. नवीन रस्त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद हवीआंबोली घाटातील दरड पाच वर्षांपूर्वी कोसळली. त्यानंतर आम्ही केसरी-फणसवडे-नेनेवाडी रस्ता पर्यायी मार्ग व्हावा, म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. पण तो रस्ता अर्थसंकल्पात आला नाही. तसेच तळकट- कुंभवडे रस्त्याला मंजुरी मिळाली असून ती अर्धवट स्थितीत आहे. या रस्त्याचे प्राथमिक सर्वेक्षण चार वर्षांपूर्वीच केले आहे. - अनामिका जाधव, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग पर्यटन नकाशावरून गायब होण्याची भीतीआंबोलीत दरवर्षी वर्षापर्यटनाला लाखो पर्यटक येत असतात. या पर्यटकांची संख्या आता मागील पाच वर्षात कमी होऊ लागली आहेत. याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण म्हणजे, सततच्या दरडी कोसळणे. पर्यटकांची संख्या कमी झाली की तेथील व्यवसायावरही परिणाम होत असतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तसेच बांधकाम विभागाने यावर उपाय योजना करणे गरजेचे आहे. अन्यथा घाट एके दिवशी आंबोली पर्यटन नकाशावरूनच गायब होईल.तत्कालीन मंत्री थोडक्यात बचावले होतेआंबोली घाटात आॅगस्ट २०१० मध्ये जेव्हा दरड कोसळली होती, तेव्हा तत्कालीन वनराज्यमंत्री भास्कर जाधव हे घाटाची पाहणी करण्यास गेले होते. मात्र, त्याचवेळी वरून एक दरडीचा दगड आला. त्यावेळी जाधव थोडक्यात बचावले होते. त्यानंतर तरी सरकार जागे होईल, असे वाटत होते. पण राजकीय आरोप- प्रत्यारोपात आंबोली घाटात जीव मुठीत घेऊन प्रवास सुरूच आहे.