शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
2
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
3
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
4
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
5
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
6
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
7
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
9
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
10
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
11
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
12
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
13
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
14
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
15
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
16
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
17
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
18
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
19
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
20
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
Daily Top 2Weekly Top 5

बुरूड व्यवसायाला उतरती कळा

By admin | Updated: November 28, 2014 23:55 IST

प्रयत्न हवेत : शासनाचा यासाठीचा पुढाकार अत्यंत गरजेचा

श्रीकांत चाळके - खेड -औद्योगिकीकरण व आधुनिक युगामध्ये भारतीय संस्कृतीमधील १२ बलुतेदारांपैकी बुरूड व्यवसायाला विविध कारणांने आता उतरती कळा लागली आहे. पोट भरण्यासाठी या समाजावर आता लाकडाची मोळी विकण्याची वेळ आली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी तयार करण्यात येत असलेल्या अवजांरामुळे हा उद्योग अडचणीत आला आहे़ याकरिता शासनाने पुढाकार घेऊनच या व्यवसायाच्या तेजीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़
शेती लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहणार की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे़ भात धान्य साठविण्यासाठी लागणारी टोपली, सुपं, चाळणी, वेतापासून बनविण्यात येणा-या वस्तु शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात़ या सर्व वस्तूु बांबूच्या सहाय्याने तयार करण्यात येत असल्याने बांबुच्या वाढलेल्या दराचा परिणाम या वस्तुंच्या दरावर होत आहे़ बांबूच्या या वस्तूंच्या दरात सध्या प्लॅस्टीकच्या वस्तु किंमतीत स्वस्त असल्याने या व्यवसायावर अनिष्ट परीणाम झाला आहे़ विशेष म्हणजे प्लास्टीकच्या वस्तू वापरणे सोयीचे आणि कमी खर्चाचे असल्याने त्यांना बाजारात मागणी आहे. याउलट बांबुंचे वाढते दर आणि अव्वाच्यासव्वा मजुरीचे दर यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे. शेती पिकवणा-या शेतक-यांची संख्या कमी झाल्याने वेतांच्या वस्तूची मागणी घटली़ तर दुसरीकडे प्लास्टीकचे आक्रमण झाल्याने या वस्तू इतिहास जमा होऊ लागल्या आहेत.
बांबू व वेताची किंमती वाढल्या़ वस्तुंच्या किमतीपेक्षा जास्त मेहनत पडत असल्याने सध्या भूक भागविणे कठिण झाले असल्याने बुरूड व्यवसाय धोक्यात आला आहे. काहींनी आपला पारंपारिक व्यवसायही बंद केला आहे़ त्यामुळें उपासमारीची वेळ आली आहे़ मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे़ तर काहींनी वडीलोपार्जित धंदा म्हणून सुरू ठेवला आहे़ अशातच बांबुंची कमतरता आणि चढत्या किमती या साऱ्या भोवऱ्यात बुरूड व्यवसाय लोप पावला आहे़ याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा बुरूड समाजाची आहे़ या समाजाला न्याय मिळाल्यास या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल़
खादी ग्राम उद्योगाने या व्यवसायाला संरक्षण देणे आवश्यक आहे़ खादीच्या अनेक योजना या व्यवसायाला पूरक आहेत़ विशेष सवलतीही दिल्या जात आहेत. मात्र घेतलेल्या कर्जाचा विनियोग केला जात नसल्याची ओरड आहे़ खादी ग्रामोद्योगकडून कर्ज घेताना अनेकांना मध्यस्थांची मदत घ्यावी लागत आहे. अज्ञानामुळे हे अनेकवेळा घडते़ त्याकरिता त्यांना मध्यस्थांना काही पैसे किंवा टक्केवारीही मोजावी लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना या व्यावसायिकांना अडचणी येतात. या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी राज्य सरकारने ठोस कृती केल्यास थेट या व्यावसायिकालाच कमी दराने कर्जपुरवठा होऊ शकेल आणि यातूनच या आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या वस्तुंच्या बाजारपेठेत बुरूड व्यवसाय टिकून राहू शकेल.


पाठपुरावा करण्यासाठी वाली नाही..
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या बारा बलुतेदारांपैकी बुरूड समाज आज संक्रमण अवस्थतेतून जात आहे. या समाजातील तरूणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला आता उर्जितावस्था येणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.


पाठपुरावा करण्यासाठी वाली नाही..
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या बारा बलुतेदारांपैकी बुरूड समाज आज संक्रमण अवस्थतेतून जात आहे. या समाजातील तरूणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला आता उर्जितावस्था येणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.