शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

निकृष्ट काम करणारे ठेकेदार काळ््या यादीत, दीपक केसरकरांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 11:32 AM

जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट काम करणारे ठेकेदार काळ््या यादीत, दीपक केसरकरांचे आदेश आंबोलीत आढावा बैठक ; ग्रामस्थांकडून बांधकाम अधिकारी धारेवर

आंबोली : जे रस्ते यावर्षी करण्यात आले आहेत आणि ते वाहून गेले त्यांची यादी मला द्या. तसेच निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ््या यादीत टाका, अशी सक्त ताकीद पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बांधकाम अधिकाऱ्यांना दिली. यावेळी आंबोली ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर बांधकामच्या अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. १४ दिवस होऊनही अधिकारी काय करीत होते, असा सवालही ग्रामस्थांनी केला आहे.पालकमंत्र्यांनी आंबोली घाटातील खचलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, बांधकाम विभागाचे अभियंता युवराज देसाई, उपविभागीय अभियता अनंत निकम, जिल्हा परिषद सदस्या रोहिणी गावडे, आंबोली सरपंच लीना गावडे, विलास गावडे, आगारप्रमुख शेख यांच्यासह चौकुळ येथील ग्रामस्थ तुकाराम गावडे, रुपेश गावडे, गुलाबराव गावडे, सरपंच रिता गावडे आदी उपस्थित होते.यावेळी पालकमंत्र्यांसमोर ग्रामस्थांनी बांधकामच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आंबोली घाटात रस्ता खचून १४ दिवस लोटले तरी कोणतीच कारवाई बांधकाम विभागाने केली नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप होता. हा संताप ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांसमोर व्यक्त करून दाखविला व बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

बांधकाम विभागाने केवळ वेळकाढूपणा केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर ग्रामस्थ बांधकाम बंद करीत असल्याचा आरोप बांधकामच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित हा आरोप खोडून काढला. यावेळी पालकमंत्र्यांनी सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी नवीन रस्ते झाले होते व जे रस्ते वाहून गेले, अशा निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांची चौकशी करून त्यांना काळ््या यादीत टाकण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.बांधकाम विभागाला ताकीद देऊन दोन दिवसांत आंबोली घाटातील रस्ता सुरळीत करून एसटी बस सुरू होईल याची व्यवस्था करा, असे पालकमंत्र्यांनी खडसावून सांगितले. त्यामुळे बुधवारपर्यंत एसटी सुरू होईल व त्यानंतर अवजड वाहनेही सुरू होतील, असे सांगण्यात आले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग