शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व बंधाऱ्यांची ‘क्रॉस चेकिंग’

By admin | Updated: August 21, 2014 00:30 IST

संदेश सावंत : जिल्हा परिषद कृषी समिती सभेत प्रश्नांचा भडीमार

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या जिल्हा अधीक्षक कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, पाणी साठवणुकीसाठी बांधलेले सिमेंट व माती बंधारे यासह विविध प्रकारच्या योजनांबद्दल समिती सदस्यांनी संशय व्यक्त केला. योजनांची प्रचार प्रसिद्धी न करता सर्व योजना या थातूर मातूर पद्धतीने राबवित असल्याचा आरोप करत सर्व बंधाऱ्यांची ‘क्रॉस चेकिंग’ करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष व कृषी समिती सभापती संदेश सावंत यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी राज्यशासनाच्या कृषी विभागाचे अधिकारी एस. आर. गोरे यांना समिती सभापती संदेश सावंत यांच्यासह सदस्यांनी योजनांबद्दल प्रश्नांचा भडीमार करत धारेवर धरले.जिल्हा परिषदेची कृषी समिती सभा बॅ. नाथ पै सभागृहात सभापती संदेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य नासीर काझी, योगिता परब, दिलीप रावराणे, गुरुनाथ पेडणेकर, रेश्मा जोशी, समिती सचिव व कृषी विकास अधिकारी एस. एन. म्हेत्रे, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. काही निवडक शेतकऱ्यांनाच राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत लाभ दिला जातो. फळपीक विमा योजनेची माहिती वेळेवर न दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनांपासून वंचित रहावे लागते. या एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती करत अधिकारी गोरे यांना धारेवर धरले. कृषी अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. यावर संदेश सावंत आक्रमक होत आपण सर्व सदस्यांच्या मताशी सहमत असल्याचे सांगत सर्व योजना थातूर मातूर असल्याचेही सांगितले.जिल्ह्यात चार तालुक्यात भात पिकाबरोबरच तूर लागवड करण्यात आली असून वैभववाडी तालुक्यात ५६२ किलो तुरीचे वाटप करण्यात आले आहे. याचा दोन ते अडीच हजार शेतकऱ्यांना लाभ दिला गेला असल्याचे सांगण्यात आले. मात्र ही बाब संशयास्पद असून तूर लागवडीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश सभेत देण्यात आले.जिल्ह्यात ७०० ग्रॅमचे ११६९ भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले असून चवळी, भेंडी, मुळा, मेथी, मिरची यासह भाजीपाल्याचे २०० रुपये प्रतिकिट कृषी विभागात उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५ हजार ६०० मेट्रीक टन खतापैकी १३ हजार ४०० मेट्रीक टन खताची विक्री करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.अभिनंदनाचा ठरावयावर्षीच्या शेतीविषयक हंगामात खते व बियाण्यांच्या बाबतीत बोगस बाब आढळून आली नाही. याबद्दल सदस्य नासीर काझी यांनी सभापती संदेश सावंत यांचा अभिनंदनाचा ठराव मांडला. (प्रतिनिधी)