शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 4:51 PM

बांदा यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देबळीराजा सुखावला, भात लावणी कामाची लगबगकाही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी

बांदा : यावर्षी पावसाने वेळेत हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहू लागले आहेत. बांदा परिसरातील काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस पडताच भात पेरणी केली होती. असे शेतकरी आता भात लावणीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. तर काही शेतकऱ्यांची भात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे.काही ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस बैलांच्या सहाय्याने केली जाणारी पारंपरिक नांगरणी कमी होताना दिसत आहे. जोत तसेच मजूर मिळत नसल्याने सध्या बहुतांश ठिकाणी पॉवर टिलरने नांगरणी केली जाते. मात्र, तरीही काही ठिकाणी आजही पारंपरिक पद्धतीने बैलजोडीने नांगरणी केली जाते.पाऊस पडल्याने डेगवे, तांबुळी, असनिये, मोरगांव परिसरात आंबा, काजू, नारळ, सुपारी कलम लागवड तसेच मशागत करण्यास सुरुवात झाली आहे. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली, पाडलोस, मडुरा, रोणापाल, शेर्ले, न्हावेली, कास, सातोसे, निगुडे भागातील ग्रामस्थांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे धान्य पिकविले जाते. समाधानकारक पावसाने बळीराजा सुखावला आहे. पाऊस असाच पडत राहिल्यास यावर्षी भातशेतीला पाण्याची समस्या उद्भवणार नाही. सध्या भातलावणीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी त्या कामात गुंतला आहे.पावसाची काहीशी उघडीपगेल्या आठवड्यात बांदा परिसरात जोरदार कोसळणाऱ्या पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. काही ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत आहे. भात लावणी करताना आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याने पर्यायी मार्गाचा अवलंब शेतकऱ्यांना करावा लागत आहे.बदलत्या काळाबरोबर शेतकऱ्यांनीही आधुनिकतेची कास धरली आहे. बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या नांगरणीची जागा आता यांत्रिकीकरणाने घेतली आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग