शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
2
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
3
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
4
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
5
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
6
पाकिस्तानी खेळाडूंना भारतात नो एन्ट्री, केवळ बहुपक्षीय स्पर्धांसाठीच परवानगी; भारत सरकारकडून भूमिका स्पष्ट
7
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
8
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
9
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, आतापर्यंत चौघांचा मृत्यू
10
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
11
यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार...
12
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
13
‘‘जॉनी जॉनी येस पापा’, सारख्या कविता मुलांना खोटं बोलायला शिकवतात’, उत्तर  प्रदेशच्या शिक्षणमंत्र्यांचा दावा  
14
Viral Video: सांगितली स्कूटर अन् दरात उभी केली बीएमडब्लू, लेकानं दिलेलं गिफ्ट पाहून आई- बाबा झाले शॉक!
15
Trisha Krishnan : महागड्या कार, आलिशान घरासह कोट्यवधींच्या संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री तृषा कृष्णन
16
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
17
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
18
Spiritual Rebirth: एकटे राहावेसे वाटणे, भावनांचा उद्रेक होणे ही असू शकतात आध्यात्मिक पुनर्जन्माची लक्षणं!
19
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
20
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
Daily Top 2Weekly Top 5

भिंत पडली, चूल विझली.. होते नव्हते गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2015 23:54 IST

अवकाळी पावसाचा फटका : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस, विद्युतपुरवठा खंडित

किडगाव : जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी बहुतांश ठिकाणी वळवाने पुन्हा हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांची धांदल उडाली. सातारा तालुक्यातील धावडशी, आकले, चिंचणी या परिसराला वळवाने चांगलेच झोडपून काढले. सोसाट्याचा वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले तर काही ठिकाणी घरांना भेगा पडल्या. विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठाही खंडित झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यात छप्पर रस्त्यावर
धावडशी येथील नारायण साहेबराव पवार यांचे जनजीवन शेतीवर अवलंबून असून यांच्या घराचे बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. पावसामुळे त्यांच्या घराचे छप्पर पूर्णत: कोसळून रस्त्यावर आले तर लोखंडी अँगलही वाकले. घराला ठिकठिकाणी भेगा पडल्याने धोका निर्माण झाला आहे. तसेच घरातील कांदे, भुईमूग, ज्वारी, शेंगा यांसह कडधान्य पावसात भिजले. घरातील संगणक, टीव्ही, टेबल, खुर्च्या यासह इलेक्ट्रीक उपकरणांचीही मोडतोड झाली आहे. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने शेतकरी नारायण पवार यांनी शासनाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.
दैव बलवत्तर म्हणून वाचलो
बुधवारी दुपारी धावडशीसह परिसरात वळवाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळाधार पावसाने शेतकऱ्यांसह नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. वादळी वाऱ्याने येथे राहणाऱ्या नारायण पवार यांच्या घराचे पत्रे उडून गेले. पाऊस सुरू असताना पवार कुटुंबिय घरात होते. घराचा पत्रा वर उचलत असल्याचे दिसताच नारायण पवार कुटुंबासह सुरक्षित ठिकाणी आले. यानंतर काही क्षणातच त्यांच्या घराचे संपूर्ण पत्रे वादळी वाऱ्याने उचकटून रस्त्यावर येऊन पडले. हे दृश्य पाहून परिसरातील ग्रामस्थांमध्ये मात्र, धावपळ उडाली. पावसामुळे पवार यांचे संसारोपयोगी साहित्य संपूर्ण भिजून गेले. व भिंतीना भेगा पडल्या. दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही सर्वजण या संकटातून वाचलो, अशी प्रतिक्रिया पवार कुटुंबियांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सगळाच प्रकार सुन्न करणारा
चिंचणी गावच्या जयवंताबाई साबळे यांच्या घराची एका बाजूची भिंत बुधवारी झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात पडली. तसेच आकले गावचे तानाजी खाशाबा इंदलकर यांच्याही घरांचे पत्रे, कौले उडाले. त्यांच्या घराचे संपूर्ण आडे तुटले असून घराच्या भिंतीला भेगा पडल्या आहेत. या पावसामुळे नारायण पवार, जयंताबाई साबळे आणि तानाजी इंदलकर यांचे मिळून सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे. नुुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.