शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 18:41 IST

अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.

ठळक मुद्देअवकाळीमुळे झालेले नुकसान मोजदाद न करता येणारे : उद्धव ठाकरेखटाव तालुक्यातील पिकांची पाहणी

मायणी : अवकाळी पावसामुळे राज्यात मोजदाद न करता येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळेपर्यंत मी शेतकऱ्यांबरोबर आहे, अशी ग्वाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.खटाव तालुक्यातील मायणी, कातरखटाव येते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ते शुक्रवारी तालुका दौऱ्यावर आले होते. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. दुपारी तीन वाजता त्यांचे जिल्ह्यात आगमन झाले. त्यानंतर येथील बागायतदार शिवाजी शामराव देशमुख यांच्या द्र्राक्षबागेची पाहणी केली. त्यांच्याबरोबर खासदार अरविंद सावंत, नितीन बानुगडे-पाटील, आमदार महेश शिंदे, शेखर गोरे यांच्यासह जिल्हा व राज्यातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, ह्यसरकार स्थापन होईल न होईल, याचे मला काही देणे-घेणे नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द निवडणुकीदरम्यान दिला आहे, तो पूर्ण करणारच आहे. मी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी येथे आलो आहे. यापूर्वी मी विदर्भ, मराठवाडा भागांमध्ये अवकाळीने झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. प्रत्येक भागात वेगवेगळी पिके घेतली जातात. त्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत करत नाही, तोपर्यंत मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. त्यांच्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.यावेळी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस पाटील प्रशांत कोळी यांच्यासह महसूल, कृषी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.प्रत्येक भागात मदत केंद्रप्रत्येक भागातील शेतकऱ्यांची समस्या वेगळी असल्याने आम्ही प्रत्येक भागात मदत केंद्र उभे करणार आहे. याठिकाणी येऊन शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडव्यात, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.विमा कंपनीकडूनही फसवणूकअवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झालेले असतानाच विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. खासगी विमा कंपनीकडूनही या भागातील ग्रामस्थांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यांची चौकशी करावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSatara areaसातारा परिसर