शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांतच शाहूपुरीत सौरदिव्यांचा ‘उजेड’

By admin | Updated: August 26, 2015 21:27 IST

पथदिवे खांबासहित चोरीस : ग्रामपंचायत हतबल ; बॅटऱ्यांसह सुट्या भागांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याने रस्ते अंधारलेले

संतोष कणसे - शाहूपुरी --येथील ग्रामपंचायतीमार्फत बसविण्यात आलेले सर्व सौरदिवे बंद स्थितीत आहेत. सौरदिव्यांचा मोठा फटका ग्रामपंचायतीला बसत असून, अनेक सौरदिव्यांच्या साहित्यासह बॅटऱ्या चोरीस गेल्याने शाहूपुरी ग्रामपंचायत अक्षरश: हतबल झाली आहे. ग्रामपंचायत फंड व कृषी खात्याकडून अनुदान या योजनेअंतर्गत शाहूपुरी ग्रामपंचायतमार्फत २००६ मध्ये १६१ सौरदिवे बसविण्यात आले होते. या परिसरातील सार्वजनिक ठिकाणी सौरदिवे बसविण्याची योजना अत्यंत उपयोगाची होती. येथे गरजेनुसार सौरदिवे देण्यात आले होते. हे दिवे बसविण्याचे काम फत्ते झाले असले तरी काही दिवसांतच या दिव्यांच्या बॅटऱ्या व बल्ब चोरून नेणारी टोळी कार्यरत झाली. बघता-बघता अनेक दिव्यांचे साहित्य चोरीस गेले.ग्रामपंचायतीच्या हद्दीत बसविण्यात आलेले दिवे बंद आहेत, हे प्रकार दिसायला किरकोळ दिसत असले तरी यामध्ये लाखोंचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. एका संचासाठी साधारण २७,५०० इतका खर्च येतो. एकूण अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस लाख खर्च झाला असल्याचे समजते. हा सर्व तोटा ग्रामपंचायतीला सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत स्थापनेनंतर सन २००६ साली सौर पथ दिवे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुशंगाने २००८ पर्यंत तीन टप्प्यात े ५८ लाख खर्चून १६१ सौरपथदिवे खरेदी करुन शाहूपुरीच्या विविध भागात बसविण्यात आले. या उपक्रमाआंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून ग्रामपंचायतीला ५ लाख ५० हजार एवढी एबसिडी देण्यात आली होती.खरेदी करतेवेळी संबंधीत कंपनीने गॅरंन्टीच्या कालावधीत विक्री पश्चात देखभाल दुरूस्ती केली. परंतु त्या दरम्यान सौर दिव्याच्या बॅटऱ्या व पॅनल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले. तसेच वेळच्या वेळी देखभाल दुरूस्तीसाठी सेवा उपलब्ध होवू शकली नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत सातत्याने वाढणाऱ्या नागरीकरणामुळे सार्वजनिक दिवाबत्तीचा प्रश्न प्रकर्षाने समोर येत होता. २००९ ला ग्रामपंचायतीने पाहणी केली असता सुमारे १५०० पथदिव्यांची आवश्यकता दिसून आली. म्हणून सर्व प्रथम ग्रामपंचायत हद्दीमधील सहकारी गृहनिर्माण संस्थाचे पथदिवे ग्रामपंचायतीकडे वर्ग करुन घेतले व जिल्हा परिषद सातारा यांच्या परवानगीने वाढीव पथ दिव्यांचा प्रस्ताव मंजूर करुन घेतला. २०१२ ला ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठपुरावा करुन वीजबिल शासनामार्फत भरण्याच्या योजनेत शाहूपुरी ग्रामपंचायतीचा समावेश करून घेतला व २०१२ पर्यंत भरलेल्या वीज बीलांची रक्कम परत मिळावी यासाठी संबंधत कार्यालयाकडे मागणी करण्यात आली आहे. सौरदिवे खांब चोरीस जाऊ नयेत म्हणून लवकरच पंचायत समिती बीडीओ यांच्याबरोबर चर्चा करून पथदिवे खांब हटविण्याचे काम सुरू करण्यात येईल. तसेच खांबाचा लिलाव करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील, असे ग्रामविकास अधिकारी एम. व्ही. कोळी यांनी सांगितले.-संतोष कणसेदिव्यांचे झाले काय ?शाहूपुरी परिसरामध्ये सौर पथदिवे बसविण्यात आले होते; मात्र सध्या अनेक सौरदिवे बंद आहेत. काही पथदिवे खांबासहित चोरीस गेलेले आहेत. याठिकाणी सौरदिवे उपयोगी ठरत होते. त्यामुळे या सौरदिव्यांचा फायदा खूप महत्त्वाचा होता. मात्र, देखभाल नसल्यामुळे जवळपास सर्वच पथदिवे बंद आहेत. नवीन बॅटरी टाकायची झाली तरी तीन ते चार हजार रुपये इतका खर्च येतो. याठिकाणी सौरदिव्यांची काय परिस्थिती आहे. याची चौकशी संबंधिताकडून झाली पाहिजे. अशी मागणी नगारिकांमधून होत आहे.