शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपण ही काळाची गरज : राजेंद्र तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:26 IST

खंडाळा : ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेझुडपे महत्त्वाचे घटक आहेत. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन पातळी समान ठेवण्यासाठी झाडांचे योगदान मोठे आहे. ...

खंडाळा : ‘पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडेझुडपे महत्त्वाचे घटक आहेत. वातावरणातील नैसर्गिक ऑक्सिजन पातळी समान ठेवण्यासाठी झाडांचे योगदान मोठे आहे. गावोगावी वृक्षारोपणाची मोहीम राबविल्यास पर्यावरण संतुलनासह परिसराचा कायापालट होऊ शकतो म्हणूनच वृक्षारोपण ही काळाची गरज आहे’, असे मत सभापती राजेंद्र तांबे यांनी व्यक्त केले.

अंदोरी, ता. खंडाळा येथे ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ सभापती राजेंद्र तांबे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, शिक्षण विस्तार अधिकारी गजानन आडे, सरपंच प्रदीप होळकर, उपसरपंच सुचेता हाडंबर, सदस्य बाळासोा होवाळ, किसन ननावरे, कैलास भिसे, दत्तात्रय धायगुडे, नवनाथ ससाणे, काळुराम होळकर, संजय जाधव, सिद्धार्थ खुंटे, ग्रामसेवक रवींद्र धायगुडे यांसह प्रमुख उपस्थित होते.

सभापती तांबे म्हणाले, ‘कोरोनाच्या काळात माणसाला ऑक्सिजनचे महत्त्व कळून आले आहे. कृत्रिम ऑक्सिजन घेऊन जीव जगवावा लागत आहे. मात्र, हेच काम झाडे सातत्याने करीत असतात. वाढत्या लोकसंख्येमुळे जंगलात अतिक्रमण होऊ लागले आहे. त्याचा परिणाम झाडांवर होऊन त्याचे प्रमाण घटले आहे. ते पूर्ववत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. या मोहिमेसाठी अंदोरी ग्रामपंचायतीला सर्वतोपरी सहकार्य करू, असा ठाम विश्वास व्यक्त केला.

...............................................