शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

सातारा जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला लागणार सुरुंग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 15:43 IST

येणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याबरोबर दोन दशकांच्या राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागू शकतो.

नितीन काळेल

सातारा : सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता असली तरी राजकीय समीकरणे बदलल्याने जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून, काँग्रेस आणि शिवसेनेची स्वबळाची भाषा सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याबरोबर दोन दशकांच्या राष्ट्रवादीच्या एकहाती सत्तेला सुरुंग लागू शकतो.

सातारा जिल्हा परिषदेला इतिहास आहे. जिल्हा परिषदेवर सुरुवातीपासूनच काँग्रेसची सत्ता राहिली; पण राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर जिल्हा शरद पवार यांच्यामागेच उभा राहिल्याचे दिसले. त्यामुळे गेल्या २० वर्षांत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आहे. राज्यात आघाडी करून राहिलेल्या काँग्रेसलाही राष्ट्रवादीने कधी सत्तेत भागीदार करून घेतले नाही. अनेकवेळा काँग्रेसने सत्तेसाठी इशारा दिला; पण राष्ट्रवादीने नेहमीच काँग्रेसवर डोळे वटारले. कारण, जिल्ह्यात काँग्रेसचा विरोध मोडून काढता येत होता, तर शिवसेना, भाजपसारखे विरोधक त्यांच्यापुढे किरकोळ होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील राजकीय स्थिती एकदम पालटली.

जिल्ह्यात पूर्वी राष्ट्रवादीचे आठपैकी सहा-सात आमदार असायचे; पण मागील विधानसभा निवडणुकीत कऱ्हाड उत्तर, फलटण, वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघातच आमदार निवडून आले. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात काँग्रेस, सातारा आणि माणमध्ये भाजपचे आमदार आहेत. कोरेगाव आणि पाटण मतदारसंघात शिवसेनेचे राज्य आहे. सातारा-जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले असून, मागीलवेळी राष्ट्रवादीत होते. पक्षापेक्षा शिवेंद्रसिंहराजेंची स्वतंत्र ताकद आहे. खासदार उदयनराजे भोसले हेही भाजपमध्ये आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला या मतदारसंघातील जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशिवाय दुसरा चेहरा नाही. पाटणला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आहेत. ते शिवेसेनेत असले तरी गटावर त्यांचे राजकारण चालते. याठिकाणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे पारंपरिक विरोधक आहेत. याठिकाणी दोघांनाही समान संधी असते.

कोरेगाव मतदारसंघाचे आमदार शिवसेनेचे महेश शिंदे असून, येथे पक्षाची ताकद कमी आहे. पूर्वी याठिकाणी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे हे आमदार होते. याठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे. माणमध्ये जयकुमार गोरे आमदार असून, भाजपमध्ये आहेत. त्यांच्यामुळेच भाजपची ताकद आहे. शेखर गोरे शिवसेनेत असून, जिल्हा बँकेचे संचालक झाल्यापासून त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा वाढली आहे. अनिल देसाई भाजपमध्ये आहेत. त्यांची कुकुडवाड गटावर पकड असून, तालुक्यातही गट कार्यरत आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादी कागदावर बळकट असली तरी ताकद दाखवता येत नाही, अशी स्थिती आहे. माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख पक्षाचा चेहरा आहेत, तर खटाव तालुक्यात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांना जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीने दुखावले. यामुळे खटावमध्ये राष्ट्रवादीला भक्कम पाय रोवावे लागणार आहेत. तसेच खटाव तालुक्यात काँग्रेसचीही ताकद काही भागात आहे.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील असले तरी माजी आमदार मदन भोसले हे भाजपवासी आहेत. त्यामुळे त्यांचा गटही येथे कार्यरत आहे. या संपूर्ण मतदारसंघात शिवसेनेची मते विचारात घेण्यासारखी आहेत. तसेच काँग्रेसचे काही नेते धडपड करताना दिसतात. कऱ्हाड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करतात. त्यातच माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि चव्हाण यांचा गट एकत्र आल्याने काँग्रेसची ताकद वाढली आहे; पण भाजपचे डॉ. अतुल भोसले यांची ताकदही दुर्लक्षून चालणारी नाही. येथे राष्ट्रवादी बळकट नाही. कऱ्हाड उत्तर मतदारसंघाचे नेतृत्व पालकमंत्री बाळासाहेब पाटील करत आहेत. या मतदारसंघातील काहीजणांनी भाजप, सेनेत प्रवेश केला असला तरी राष्ट्रवादीची ताकद आहे.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील राजकीय चित्र बदलले आहे. त्यातच जिल्हा बँक निवडणुकीपासून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वबळाची भाषा सुरू केली आहे. भाजप विरोधातच राहणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणे अशक्य आहे. यामुळे राष्ट्रवादीला ठिकठिकाणी भाजप, शिवसेना आणि काँग्रेसशी झगडावे लागणार आहे. त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीला संघर्ष करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. परिणामी जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता घेता येईल, अशी परिस्थिती राष्ट्रवादीसाठी राहणार नाही.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरzpजिल्हा परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा