शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 

By नितीन काळेल | Updated: April 30, 2025 21:03 IST

सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे.

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: जिल्ह्यात उन्हाळी झळा तीव्र झाल्या असून सातारा शहराचा पारा तीन दिवसांपासून ४०.७ अंशावर स्थिर आहे. यामुळे नागरिक ऊन आणि उकाड्याने हैराण झाले आहेत. तसेच जिल्ह्याच्या पूर्व भागातील जनजीवन विस्कळीत होण्याची वेळ आलेली आहे.

सातारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडाक्याचे ऊन पडू लागले आहे. मागील काही वर्षांची तुलना करता यंदाचा एप्रिल महिना अधिक तापदायक ठरला आहे. कारण, सतत पारा वाढलेला आहे. सातारा शहर हे पश्चिम भागात असलेतरी पारा कायमच ४० अंशावर राहिला आहे. त्यातच मागील तीन दिवस तापमान ४०.७ अंश नोंद होत गेले. यामुळे सातारकरांना उन्हाळी झळांशी सामना करावा लागतोय. तसेच घरातून बाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. तर रात्रीही उकाड्यामुळे हैराण होण्याची वेळ आली आहे.

पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव आणि फलटण तालुक्यातील पारा ४२ अंशावर गेला आहे. यामुळे सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढत जाते. परिणामी दुपारी दोन ते चार या वेळेत उन्हाचा कहर असतो. समोर पाहिले तरी रखरखत्या उन्हामुळे डोळ्यांना त्रास होत आहे. घराबाहेर पडणेही अवघड होऊन गेलेले आहे. यामुळे ग्रामीण भागातील जनजीवनावर या उन्हाचा चांगलाच परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्यातही पारा आणखी वाढणार आहे. त्यामुळे सातारा शहराचा पारा ४१ अंशावर जाऊ शकतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर