शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
3
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
4
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
5
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
6
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
7
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
8
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
9
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
12
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
13
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
14
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
15
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
16
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
17
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
18
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
19
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
20
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

७२ तासांत उत्पादन थांबवा

By admin | Updated: May 17, 2015 01:28 IST

‘किसन वीर’, ‘कृष्णा’ला आदेश : कृष्णेचे पाणी दूषित केल्याप्रकरणी कारवाई

सातारा : कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित केल्याचा ठपका ठेवत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या येथील उपप्रादेशिक कार्यालयाने वाई तालुक्यातील ‘किसन वीर’ व कऱ्हाड तालुक्यातील ‘कृष्णा’ या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांना ७२ तासांच्या आत उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. दि. १४ मे रोजी ही नोटीस धाडण्यात आली आहे. किसन वीर सहकारी साखर कारखान्याचा चिंधवली नाल्याजवळ कंपोष्ट खत प्रकल्प आहे. लिंब (ता. सातारा) येथील लोकांच्या तक्रारींवरून उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाने प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. या प्रकल्पाचे दूषित पाणी चिंधवली नाल्यातून कृष्णा नदीत मिसळत असल्याचे उपप्रादेशिक प्रदूषण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. याबाबत किसन वीर कारखान्याला नोटीसही देण्यात आली होती; परंतु तिचे उत्तर न आल्याने उत्पादन प्रक्रिया थांबविण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कारखान्याला पाठविलेल्या नोटिसीत म्हटले आहे. तसेच कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे प्रदूषित पाणीही कृष्णा नदीत मिसळत आहे. याठिकाणीही उपप्रादेशिक प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. या कारखान्याला प्रदूषण मंडळातर्फे कारणे दाखवा नोटीस धाडण्यात आली होती. आॅक्टोबर २०१४ व मार्च २०१५ अशा दोन नोटिसा पाठवूनही त्याबाबत समाधानकारक उत्तर आले नाही. कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित करण्याचा ठपका या दोन कारखान्यांवर ठेवला आहे. हे दोन्ही कारखाने ‘नो पोल्युशन’ झोनमध्ये येतात. त्यामुळे या कारखान्यांनी हवा व पाणी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे.कारखान्यांनापरवाना देताना पाणी, हवा यांचे प्रदूषण होणार नाही, याबाबत काळजी घेणे हे कायद्याने बंधनकारक असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे. प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए. एफ. देशमाने यांनी ही नोटीस बजावली आहे. (प्रतिनिधी)