शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या लाल सोन्याची तस्करी!

By admin | Updated: May 23, 2015 00:33 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : कास तलाव परिसरातील कृत्रिम खड्ड्यांत साचतोय कचरा

पेट्री : साताऱ्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटरवरील कासचे जागतिक वारसा हक्काच्या यादीत समावेश झाल्याचा अभिमान बाळगला जातोय, पण त्याचे जनत करताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडत आहे. कास तलाव परिसरातून दिवसाढवळ्या ‘लाल सोन्या’ची तस्करी केली जात आहे. यामुळे पडलेल्या कृत्रिम खड्ड्यांमध्ये कचरा साचत असल्याने तलावातील पाणी धोक्यात आले आहे.नैसर्गिक वारसा लाभलेल्या कास तलावाचे सौंदर्य लाल मातीमुळे उठून दिसत आहे. त्यामुळेच परिसरातील लाल मातीला जणू लाल सोन्याची उपमा दिली जाते. या मातीच्या गुणधर्मामुळे नारळ, आंबा, फणस, सुपारी आदींचे चांगले उत्पादन मिळत आहे. तसेच सुशोभीकरणासाठीही लाल मातीला मोठी मागणी आहे.मुबलक पाऊस, घनदाट झाडी, उंचसखल भाग यामुळे चित्रपटसृष्टीलाही भुरळ पडत असतानाच काही समाजकंठकांची दृष्ट लागायला लागली आहे. गेल्या काही वर्षांपासून तलावालगतच्या जमिनीतील लाल मातीचे बेकायदेशीररीत्या उत्खनन केले जात आहे. यासाठी यंत्रांचाही वापर केला जात आहे. यामुळे तलाव परिसरात मोठ-मोठे खड्डे पडायला लागले आहेत.तलाव परिसरात वारंवार होत असलेल्या ओल्या, सुक्या पार्ट्या, मद्यपींनी टाकलेल्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, पत्रावळ्यांबरोबरच असंख्य अविघटनशील वस्तू टाकले जात आहेत. यामुळचे खड्ड्यांत कचऱ्याचे ढीग साठत आहेत. पावसाळा काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. पावसाचे पाणी डोंगर उतारावरून तसेच खड्ड्यातील हा कचरा वाहून तलावातील पाण्यात मिसळला जाण्याची शक्यत आहे. यामुळे सातारा शहराला पाणीपुरवठा करणारे कास तलावही दूषित होण्याचा धोका वाढला आहे. परिसरात वेळोवेळी येणारे ट्रेकर्स, स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी हा कचरा उचलतात. मात्र, पर्यावरणाच्या मुळावर उठलेल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पर्यावरण व महसूल विभागाने कडक पावले उचलावेत, अशी मागणी केली जात आहे. परिसरात फिरायला आल्यावर येथील रानमेव्याचा मनमुराद आनंद लुटता येतो. परंतु, खड्डे पडून तेथील मातीचे उत्खनन झाल्याने करवंद, जांभूळ यासारख्या कित्येक वनस्पतींची हानी होत आहे. या खड्ड्यांतील कचऱ्याची विल्हेवाट नाही लावली तर नैसर्गिक सौंदर्य हरवून नाही बसलो तरच नवल. (वार्ताहर)४पार्ट्या केल्यानंतर खड्ड्यात कचरा टाकला जातो. तर काही ठिकाणी अस्ताव्यस्त पसरलेला दिसतो. परंतु, येथील उकरण्यात आलेल्या मातीचे काय? यासंबंधी प्रश्न अनुत्तरित आहेत. यासंदंर्भात वेळीच पावले नाही उचलले तर भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते.पाण्यात पडलेल्या बाटल्या, ग्लास, प्लेट व अन्य प्लास्टिक वस्तू, थर्माकॉलच्या तुकड्यांमुळे भविष्यात पाण्यात किडे, अळ्या होण्याचा धोका असतो. तलाव परिसरात चालत असलेल्या ओल्या पार्ट्या रोखण्यासाठी कडक पावले उचण्यासाठी वेळीच सावध होण्याची गरज आहे.- मुकेश जाधव, पर्यटक, सातारा.