शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालयच बंद असल्याने मिळेना प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST

सातारा : ‘गाव तिथं एसटी’ अन् ‘प्रवाशी हेच दैवत’ हे ब्रीदवाक्य घेऊन उत्पन्नापेक्षा प्रवाशांच्या सेवेला महत्व देऊन एसटीने ...

सातारा : ‘गाव तिथं एसटी’ अन् ‘प्रवाशी हेच दैवत’ हे ब्रीदवाक्य घेऊन उत्पन्नापेक्षा प्रवाशांच्या सेवेला महत्व देऊन एसटीने सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कड्या-कपाऱ्यांतील दुर्गम वाड्या वस्त्या, जावळी खोऱ्यातील गावागावत जाळं विणलं आहे. पण कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये अजूनही बंद असल्याने हक्काचे प्रवासी घरात आहेत. त्यामुळे आधीच तोट्यात असलेल्या एसटीने उत्पन्न मिळविण्यासाठी पुणे, मुंबई आदी मोठ्या शहरांमध्ये धाव घेतली आहे.

एसटीचे मुख्य उत्पन्नाचे साधन हे विद्यार्थी वाहतूक आहे. कोरोनापूर्वी विद्यार्थ्यांची गरज भागविताना एसटीची दमछाक होत होती. मात्र आता सर्वच विद्यार्थी घरात बसून आहेत. त्यातच कोरोनाचा धोका असल्याने लोक शहरात जाण्यास धजावत नाहीत.

चौकट

शहरात येण्यासाठी ‘टमटम’ किंवा खासगी वाहने

सातारा तसेच प्रमुख शहरात ग्रामीण भागातून येण्यासाठी एसटी नसल्याने टमटम किंवा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मिळेल त्या गाड्यांना हात करुन थांबविले जाते. यामध्ये अनेकदा ट्रक, टॅँकरचाही समावेश असतो.

कोट

सातारा आगारातून सध्या राज्यातील प्रमुख शहरात वाहतूक सुरू असली तरी सोमवार, दि. १९ पासून तालुक्यातील ग्रामीण भागात फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. त्यामुळे होणारी गैरसोय दूर होणार आहे.

- रेश्मा गाडेकर

आगार व्यवस्थापक, सातारा.

सातारा तालुक्यातील धावडशीला पूर्वी सकाळी सहापासून दहापर्यंत एसटी यायची. मात्र आता एकही गाडी येत नसल्याने साताऱ्याला येण्यासाठी मिळेल त्या वाहनाला हात करण्याची वेळ आमच्यावर येत आहे.

- सागर पवार, प्रवासी.

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरुन दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. पण त्या साताऱ्यातील पंधरा वीस किलोमीटर अंतरातील लहान गावांमध्ये राहत नाहीत. त्यावर उपाय निघणे गरजेचे आहे.

- स्वप्निल शिंगटे, प्रवासी

बावीस हजारांचा रोजचा प्रवास पण ग्रामीणशिवाय

सातारा आगारातून पुणे, मुंबई, बोरिवली आदी भागात एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत.

सातारा आगारातून दररोज सरासरी बावीस हजार किलोमीटरच्या फेऱ्या सुरू आहेत.

ग्रामीण प्रवाशांना याचा काहीच फायदा होत नाही. त्यामुळे एसटी लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी होत आहे.