शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

सातारकरांनी सोमवारपर्यंत रात्रीचा प्रवास टाळाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यासह राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एसटीची सेवा सुरू झाली असली तरी अद्याप रातराणीच्या फेऱ्या ठप्प आहेत. त्यामुळे आगामी काही दिवस तरी सातारकरांनी रात्रीचा प्रवास करणे टाळणेच योग्य ठरणार आहे.

कोरोनाचा शिरकाव सातारा जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्चमध्ये झाला. त्यानंतर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीवर निर्बंध आणले होते. सुमारे सहा ते सात महिने एसटीच्या फेऱ्या बंद होत्या. दरम्यानच्या काळात कोरोना नियंत्रणात आला. दसरा दिवाळीनंतर एसटी पूर्ववत सुरू झाली. लांब पल्ल्याच्या गाड्या धावत असल्याने रात्रंदिवस चोवीस तास प्रवासी वाहतूक सुरू होती. मात्र जिल्ह्यात पुन्हा एप्रिलमध्ये पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने डोके वर काढले. यामुळे पुन्हा सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या एसटीच्या फेऱ्यांचा ब्रेक लागला. दोन ते तीन महिने गाड्या गुन्हा बंद होत्या.

दरम्यान, दुसरी लाटही ओसरू लागल्यानंतर एसटी सुरू झाली. मात्र अद्यापही हवे त्या प्रमाणात प्रवासी मिळत नसल्याने एसटीच्या रातराणी गाड्या बंद आहेत. सातारा आगारातून शेवटची गाडी साडेपाच वाजता निघते. त्यानंतर गाडीच नाही. दरम्यान, बाहेरील विभागातून कलेढोण-मुंबई ही गाडी रात्री नऊच्या सुमारास येते. कोल्हापूर, सांगली विभागातून एखाद-दुसरी गाडी येते. पण त्याचेही वेळापत्रक निश्चित नसल्याने रात्री बसस्थानकात शुकशुकाट जाणवत असतो.

चौकट..

पुणे, मुंबईलाही दुपारपर्यंत प्रवासी

सातारा विभागातून स्वारगेट, मुंबई, बोरवली या मार्गांवर बऱ्यापैकी प्रवासी वाहतूक सुरू असते. सातारा-स्वारगेट विनाथांबासाठी दररोज ५८ फेऱ्या धावतात. त्यापैकी तीस फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मात्र अजूनही दुपारच्या गाड्यांना प्रवासी मिळत नाहीत. त्यामुळे त्या रद्द करण्याची वेळ सातारा आगारातील व्यवस्थापनावर येत आहे.

चौकट २

खूपच गरज असेल तर महामार्गावर...

साताऱ्यातील खासगी प्रवासी गाड्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात उभारत असायच्या. मात्र तेथे जम्बो कोरोना सेंटर सुरू झाल्यानंतर तिथून थांबा हलविण्यात आला. तेव्हापासून एसटी स्टँडच्या पाठीमागे रस्त्यावर उभे राहतात. मात्र त्यांनाही प्रवासी मिळत नसल्याने तेथे रात्रीच्या वेळी शुकशुकाट जाणवत असतो. रात्रीचा प्रवास करणे खूपच अत्यावश्यक असल्यास काही सातारकर पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर जाऊन इतर जिल्ह्यातून येणाऱ्या खासगी प्रवासी वाहनांचा वापर करत असतात.

कोट

सातारा विभागातून सध्या २२५ गाड्या दररोज धावत असतात. यामध्ये गाड्यांच्या फेऱ्याही वाढविल्या जात आहेत. मात्र दुपारनंतर प्रवासी मिळत नसल्याची शोकांतिका आहे. तरीही सोमवार दि. २१ पासून प्रमुख आगारातून लांब फेऱ्यांसाठी रातराणी गाड्या सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे सातारकरांची चांगली सोय होणार आहे.

- सागर पळसुले,

विभाग नियंत्रक सातारा.

जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या फेऱ्या

२२५

रातराणी फेऱ्या

००

चालक

२२५

रातराणी

००