शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

ऑफलाइनच्या सूचनेनुसार पालकांमधील संभ्रम दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 4:40 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने सुरक्षेबाबत आवाहन केले आहे. दहावी-बारावी परीक्षेबाबत बोर्डाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता प्रशासनाने सुरक्षेबाबत आवाहन केले आहे. दहावी-बारावी परीक्षेबाबत बोर्डाने ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पालकांमधील संभ्रम दूर झाला आहे. शाळा-महाविद्यालयांनीही कोरोनामुळे सुरक्षेबाबत दक्षता घेत सराव परीक्षांना प्रारंभ केला आहे.

दहावी व बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण आहे. शासनाच्या आदेशानुसार जूनपासून ऑनलाइन अध्यापन सुरू होते. मात्र नोव्हेंबरपासून ऑफलाइन अध्यापनास प्रारंभ झाला. बहुतांश अभ्यासक्रम आधीच पूर्ण झाला असल्याने शाळांनी अभ्यासक्रमाचा सराव सुरू केला होता. प्रत्यक्ष परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत पेपर लेखनाचा सराव घेण्यात येत आहे.

कोरोनामुळे संपूर्ण वर्ष भीतीमध्ये गेले. रुग्णवाढीनंतर परीक्षेबाबत धाकधूक निर्माण झाली होती. मात्र प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचे जाहीर करून दिलासा दिला आहे.

- अजिता जाधव, पालक

ऑफलाइन परीक्षा होणार असल्या तरी कोरोनाचे सावट अद्याप आहे. त्यामुळे सुरक्षितता गरजेची आहे. परीक्षेबाबत बोर्डाने धोरण जाहीर करणे गरजेचे आहे.

- आसिफ शेख, पालक

बहुधा परीक्षेसाठी शहरात जावे लागते. मात्र कोरोना रुग्ण वाढत असल्याने याबाबत दक्षता म्हणून परीक्षा ऑफलाइन घेण्याबाबत फेरविचार करण्यात यावा.

- सुनीता पालकर, पालक

कोरोना संकटात परीक्षा केंद्रापेक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्यात याव्यात. जेणेकरून परीक्षेसाठी दुसऱ्या गावात जाण्याची यातायात करावी लागणार नाही.

- सतीश कोल्हापुरे, पालक

परीक्षा केंद्रातील विद्यार्थी गर्दी विचारात घेता सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी परीक्षा केंद्रात वाढ करण्याची आवश्यकता आहे. याबाबत लवकर निर्णय घ्यावा.

- मृणालिनी जोशी, पालक

परीक्षा तोंडावर आहेत. नेमके रुग्णवाढीचे प्रमाणही वाढीस लागले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी नियोजन करीत असताना तळागाळातील विद्यार्थ्यांचा विचार व्हावा.

- शालिनी जगदाळे, पालक

दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : ४४,०११

बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या : ३५,७०१