शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
2
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
3
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
4
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
5
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
6
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
7
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
8
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
9
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
10
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
12
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
13
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
14
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
15
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
16
प्रेमाचं नाटक, लग्नाचं आमिष आणि त्यानंतर...; मोहम्मद शमीच्या भावावर गंभीर आरोप
17
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
Daily Top 2Weekly Top 5

धरणग्रस्तांचे सहा महिन्यांत म्हसवड येथे पुनर्वसन

By admin | Updated: May 7, 2015 00:18 IST

प्रशासकीय बैठकीत निर्णय : लेखी आश्वासनानंतर वेणेखोलच्या ग्रामस्थांनी उपोषण घेतले मागे

परळी : गेली आठ वर्षे पुनर्वसनापासून वंचित असलेल्या उरमोडी प्रकल्पबाधित वेणेखोल ग्रामस्थांना प्रशासनाने पुन्हा पुनर्वसनाबाबत सहा महिन्यांची ‘डेडलाईन’ दिली आहे. बुधवारी झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची चर्चा केली. वेणेखोल ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील ही शेवटची बैठक होती. यामध्ये निर्णय न झाल्यास उरमोडीचे पाणी सोडणार किंवा जलसमर्पण करणार, असा निर्णय घेतल्याने प्रशासनाने वेणेखोल ग्रामस्थांचे पुनर्वसन म्हसवड, ता. माण येथे सहा महिन्यात करण्याचा निर्णय घेतला आहे.बुधवारी धरणग्रस्तांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, उपजिल्हाधिकारी (महसूल) व अतिरिक्त जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे, जिल्हा पुनर्वसन तहसीलदार स्मिता पवार, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, उरमोडी धरण अभियंता दाभाडकर, पुनर्वसनचे अधिकारी तसेच वेणेखोल धरणग्रस्तांसह उरमोडी जलाशयात बाधित झालेले २३ गावचे प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
धरणग्रस्तांनी पुनर्वसनासाठी वारंवार आंदोलने केली. मात्र प्रशासनाकडून त्यांना फक्त तारीख पे तारीख मिळत आहे. परंतु बुधवारी झालेल्या बैठकीत प्रशासनाने वेणेखोल ग्रामस्थांना सहा महिन्यात म्हसवड, ता. माण येथील १३९.५४ हेक्टर क्षेत्रात पुनर्वसन करणार असून ६५ टक्के रक्कम लवकरच देणार असल्याचे सांगितले. मात्र, गेली अठरा वर्षे आम्ही हेच ऐकत आहे. आम्हाला तसे लेखी पत्र द्या, असा निर्णय धरणग्रस्तांनी घेतला. त्यानंतर प्रशासनाने म्हसवड येथे पुनर्वसन करणार असल्याबाबतचे पत्र आंदोलकांना दिले. (वार्ताहर)

लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
वेणेखोल ग्रामस्थांनी आजच्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास धरणातील पाणी सोडणार किंवा जलसमर्पण करणार असल्याचा निर्णय घेतला होता. यासाठी धरणाच्या भिंतीवर सुमारे तीनशे धरणग्रस्त थांबले होते. प्रशासकीय अधिकारी स्मिता पवार, अभियंता दाभाडकर यांनी उरमोडी धरणावर जाऊन भिंतीवर बसलेल्या आंदोलकांना म्हसवड येथे पुनर्वसन करणार असल्याचे पत्र दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

अनेक वर्षे आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला आहे आणि आजच्या निर्णयावरही ठेवतो आहे. मात्र, प्रशासनाने शब्द न पाळल्यास आम्ही उरमोडीचे पाणी सोडून आमच्या जमिनी पुन्हा कसणार आहे.
- विठ्ठल सपकाळ, सदस्य, वेणेखोल धरणग्रस्त समिती