शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

साठेबाजीमुळेच कांद्याचे दर गगनाला..!

By admin | Updated: August 26, 2015 21:28 IST

ग्राहकांची गर्दी : घरात साठवून ठेवलेला कांदा येऊ लागला बाजारात; शेतकऱ्यांना झटपट लॉटरीचा अनुभव

सातारा : मागील दोन महिन्यांपासून कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली आहे. कांद्याची आवक घटली असल्याचे कारण पुढे करत ही दरवाढ होत आहे. परंतु जून-जुलै मधील आलेली कांद्याची आवक बाजारातून गायब कुठे झाली? याचा कोणीही विचार केला नाही. त्यामुळे कृत्रिम टंचाई करून कांद्याचे दर वाढले असून, हा कांदा साठेबाजांनी दाबून ठेवला असल्याची शक्यता व्यापार व ग्राहकांतून वर्तवली जात आहे.पावसाळ्याच्या चार महिने म्हणजेच जून ते आॅक्टोबर महिन्यांत लागणारा कांदा हा साधरणता एप्रिल ते मे महिन्यांतच बाजारात आलेला असतो. पावसाळ्यात पडलेल्या दुष्काळ, अतिवृष्टीमुळे कांद्याचे पीक हाती लागत नाही. त्यामुळे या चारही महिन्यांसाठी लागणारा कांदा हा एप्रिल मे महिन्यांतच मोठ्या प्रमाणात येतो. उन्हाळ्यात येणाऱ्या कांद्याची आवक ही साधारणता पाच-सहा महिने पुरेल एवढी उत्पादीत झालेली असते; परंतु अलीकडे या गोष्टीचा फायदा घेत जून-जुलै महिन्यांतच आलेला कांदा साठेबाज धनदांडग्यांकडून साठवून ठेवला जातो. साधरणता जुलै-आॅगस्टपासून बाजारपेठेत कांद्याची कृत्रिम टंचाई भासवून दर वाढविला जात आहे. त्यामुळे यामागे एखादी मोठी साठेबाजांची साखळी असण्याची शक्यता व्यापारी व ग्राहकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.संपूर्ण राज्यात लासलगाव, पिंपळगाव, नाशिक याठिकाणांहून कांद्याची निर्यात होते. साधारणता एप्रिल-मे महिन्यांत ठेवणीचा गरवा जातीचा कांदा हा संपूर्ण पावसाळ्यात टिकेल, असा बाजारात येतो. त्याचे दरही अगदी ८ रुपये ते १५ रुपयांप्रमाणे विक्रीला आलेला असतो. नेमके त्याचवेळी मोठ्या प्रमाणात हा कांदा बाजारातून उचलला जातो. त्यामुळे संपूर्ण राज्यात कांद्याच्या अवकाची घट दिसून येते. व कांदा हळूहळू मागणीमुळे महाग होत जातो. तर पावसाळ्यात कांद्याचे पीक अल्पप्रमाणात घेण्यात येत असल्याने बाजारात कांदा मागणी पेक्षाही कमी असल्याने दर वाढतच जातो. त्यानंतर साठेबाजांचा कांदा बाजारात दाखल होतो. साधारणता १५ रुपयांचा कांदा अगदी ७० ते ८० रुपये दराने विकला जातो. कमी वेळेत जास्त फायदा होत आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यातच कांदा महाग का?पावसाळ्यात एकतर दुष्काळजन्य परिस्थिती असते किंवा अतिवृष्टी असते. त्यामुळे कांद्याचे पीक सहजासहजी शेतकरी घेत नाही. याचाच फायदा घेत साठेबाज पावसाळ्यात लागणारा कांदा उन्हाळ्यात घेऊन साठवतात. व पावसाळ्यात कृत्रिम टंचाई भासवून कांद्याला अगदी शंभर रुपयांपर्यंत दर ठेवतात. साधारणता कांदा हा पाच-सहा महिने चांगला टिकतो. पावसाळ्यात वातावरण थंड असल्याने एखाद्या मोकळ्या शेडमध्ये कांदा पसरून ठेवला तर तो अगदी पाच-सहा महिने टिकतो.शासनाने कांदा साठेबाजारांवर कारवाईचे आदेश दिले तर दुसरीकडे कांद्याचे दर आवाक्यात येण्यासाठी कांदा आयातीचा निर्णय घेतला, त्यामुळे साठेबाजांचे धाबे दणाणले. अन् कोणत्याही आयातीशिवाय बाजारात कांद्याची आवक वाढली. शासनाने काढलेल्या आदेशामुळे केवळ एकाच आठवड्यात कांद्याने दराची उंची गाठली होती. ती कमी झाली त्यामुळे कांद्याचा काळाबाजार होते हे सिद्ध होत आहे.-राजेंद्रसिंह रजपूत, ग्राहक