शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रणजितसिंह नाईक-निंबाळकर मंत्रिपदाच्या शर्यतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

सातारा : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे जोरात वाहत असून, यामध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे ...

सातारा : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे जोरात वाहत असून, यामध्ये माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत पुढे आले आहे. तरुण चेहरा व पश्चिम महाराष्ट्रात भाजप आणखी बळकट करण्यासाठी म्हणून का होईना रणजितसिंहांना लॉटरी लागू शकते, असे संकेत मिळत आहेत.

संसदेचे अधिवेशन पुढील काही दिवसांत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे सुरू झाले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. यामध्ये कोणाला घ्यायचे अन् कोणाला वगळायचे यावरून केंद्रस्तरावर वेगवान घडामोडी सुरू आहेत. महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांचे नाव सर्वात पुढे आहे. त्याचबरोबरीने आता माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही शर्यतीत आले आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, माढा, सांगोला आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील मतदार यासाठी मतदान करतात. तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण विधानसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश आहे. १५ वर्षांपूर्वीपर्यंत भाजप पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, सांगली जिल्ह्यांत कमकुवत होती. चाचपडत प्रवास सुरू होता. पण, गेल्या काही वर्षांत पक्षाने मुसंडी मारली. पक्षाचे सध्या सोलापूर, सांगली, माढा, पुणे येथे खासदार आहेत. पक्षाला पश्चिम महाराष्ट्रात आणखी बळकट करण्याचा प्रयत्न भाजपचा असून त्यादृष्टीने रणजितसिंहांना लॉटरी लागू शकते.

चौकट :

आश्वासनाचा विचार होणार...

पश्चिम महाराष्ट्रात आजही राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. काँग्रेसही मागोमाग चाललीय. सहकाराच्या पट्ट्यात भाजपला आणखी भक्कम करायचे झाल्यास रणजितसिंहांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. यासाठी राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेतेही अनुकूल राहू शकतात. कारण, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष असणारे रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी हात सोडून कमळ जवळ केले होते. त्यावेळी त्यांना केंद्रात मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात रणजितसिंहांचे नाव चर्चेत आले आहे.

........................................................