शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

राजवाडा चौपाटी अखेर बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : राजवाडा चौपाटीवरील चार हातगाडीधारकांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : राजवाडा चौपाटीवरील चार हातगाडीधारकांना कोरोनाची लागण झाल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव चौपाटी बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शुक्रवारी शहर विकास विभागाला दिले. संबंधित परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित झाला असून, हातगाड्यांच्या परिसराला बॅरिकेटिंग केले जाणार आहे.

साताऱ्यातील राजवाडा चौपाटीचा विषय सर्वाधिक चर्चेचा ठरला. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही येथील शंभरहून अधिक विक्रेत्यांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाली नव्हती. यानंतर दोन महिन्यांपूर्वी आळूचा खड्डा येथे पालिका प्रशासनाने हातगाडीधारकांना व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र, ग्राहक फिरकत नसल्याने विक्रेते आर्थिक संकटात सापडले होते. अखेर हा प्रश्न खा. उदयनराजे भोसले यांच्या कोर्टात गेला आणि त्यांनी तातडीने राजवाडा गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्याचे आदेश दिले. तब्बल वर्षभरानंतर चौपाटी सुरू झाली खरी; परंतु हातगाडीधारकांच्या मागे लागलेली समस्यांची शुक्लकाष्ट काही सुटलेली नाही.

खाद्यपदार्थाच्या गाड्या सुरू करण्यापूर्वी येथील ७५ हातगाडीधारकांनी कोरोना चाचणी केली. यापैकी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चौपाटीवर आठ ते दहा हातगाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, विक्रेत्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊ लागल्याने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी सुरक्षिततेचा कारणात्सव चौपाटी बंद करण्याचे आदेश शुक्रवारी हर विकास विभागाला दिले.

जोपर्यंत चौपाटीवरील सर्व विक्रेत्यांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत नाहीत तोपर्यंत चौपाटी बंद राहणार असल्याचे बापट यांनी सांगितले. ज्या विक्रेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे त्यांच्या हातगाड्यांना बॅरिकेटिंग करणे शिवाय संपूर्ण परिसर निर्जंतुक करण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत.

(चौकट)

धास्ती कायम...

सातारा पालिकेने कस्तुरबा व गोडोली येथील रुग्णालयाच्या माध्यमातून शहरातील व्यापारी, विक्रेते व दुकानदारांची आरटीपीसीआर चाचणी सुरू केली आहे. आठ दिवसांमध्ये साठ व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. बाधितांची संख्या वाढू लागल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.