शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

नवजा, महाबळेश्वरचा पाऊस चार हजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:44 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असला तरी आतापर्यंत नवजा आणि महाबळेश्वरला ४ हजार मिलीमीटरवर ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात सध्या तुरळक स्वरुपात पाऊस होत असला तरी आतापर्यंत नवजा आणि महाबळेश्वरला ४ हजार मिलीमीटरवर पर्जन्यमान झाले आहे. तर कोयनेला आतापर्यंत ३४३० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन आठवड्यापूर्वी धुवाधार पाऊस झाला होता. कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, बामणोली या भागात तर तुफान वृष्टी झाली. यामुळे शेतीचे नुकसान झाले. तसेच रस्ते, पूल वाहून गेले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक आली. कोयना धरणात तर एका दिवसात १६ टीएमसीवर पाण्याची आवक झाली. कोयना धरणाच्या इतिहासातील हा एक विक्रम ठरला. त्यामुळे अवघ्या काही दिवसात कोयना धरणातील पाणीसाठा ९० टीएमसीच्यावर पोहोचला होता. तर कण्हेर, उरमोडी, धोम, बलकवडी, तारळी या सारख्या धरणांतही मोठ्या प्रमाणात पाणी आले. सध्या पश्चिम भागात पाऊस कमी झाल्याने धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. त्यामुळे कोयना वगळता अन्य धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे.

गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ८ मिलीमीटर पाऊस झाला. तर नवजा येथे १४ आणि महाबळेश्वरला सकाळपर्यंत ७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यावर्षी जुलै महिन्यात अवघ्या तीन दिवसांत पश्चिम भागात तुफान पाऊस पडला होता. यामुळे कोयना, नवजा आणि महाबळेश्वरच्या पावसाने नवा विक्रम केला. तर सध्या पावसाचे प्रमाण तुरळक असले तरी आतापर्यंत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. कोयना येथे जूनपासून आतापर्यंत ३४३० मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर नवजाला ४३८८ आणि महाबळेश्वरला ४४८० मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. पावसाळ्याचा अजून दीड महिना बाकी आहे. त्यामुळे या तीनही ठिकाणचे पर्जन्यमान ५ हजार मिलीमीटरचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चौकट :

कोयनेतील साठा ९१ टीएमसीजवळ...

पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावलेली आहे. त्यामुळे कोयना वगळता इतर धरणांतून विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ९०.८८ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला होता. तर धरणात २१०० क्युसेक पाण्याची आवक होत होती. धरणाच्या दरवाजातील विसर्ग आठ दिवसांपासून बंद आहे. सध्या फक्त पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

.......................................................