शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता आल्यावर शहाणपण सुचतं!

By admin | Updated: November 25, 2014 23:46 IST

वक्तव्याचा समाचार : पृथ्वीराज चव्हाणांचा खडसेंना टोला

कऱ्हाड : ‘राज्य सरकारमधील मंत्री एकनाथ खडसे यांचे शेतकऱ्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सत्ता आल्यावर शहाणपण सुचण्यातला प्रकार आहे,’ असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकारांशी बोलताना लगावला़
यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रीतिसंगमावरील त्यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते़
चव्हाण म्हणाले, ‘राज्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे़ त्यामुळे पंचनामे अन् केंद्र सरकारच्या आदेशाची वाट न पाहता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने त्वरित मदत द्यावी़ त्यात विलंब केला तर काँग्रेस पक्ष राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल़’
‘सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने सामान्य जनतेची घोर फसवणूक केली आहे़ निवडणुकीच्या अगोदर त्यांनी अनेक आश्वासने दिली; पण ती आता पाळली जात नाहीत़ त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे़ जनतेच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसेल तर काँग्रेस आक्रमक पवित्रा घेईल़,’ असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)