शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे सकारात्मक धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:14 IST

मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३५ वर्षे शासन दरबारी रखडत आहे. पुनर्वसन संघर्ष कृती ...

मळे, कोळणे व पाथरपुंज या तिन्ही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गेली ३५ वर्षे शासन दरबारी रखडत आहे. पुनर्वसन संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून या तिन्ही गावांनी आंदोलन पुकारले होते. आंदोलन सुरू असताना उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, चांदोली वनाधिकारी महादेवराव मोहिते, उत्तमराव सावंत यांच्यासह तलाठी, कर्मचारी, आदी महसूलसह वनविभागाचे अधिकारी आपले दप्तर घेऊन आंदोलनस्थळी दाखल झाले. पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, सदस्य बबनराव कांबळे हेही यावेळी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. अधिकाऱ्यांनीही त्यांना समर्पक उत्तरे दिली.

प्रांताधिकारी श्रीरंग तांबे यांनी पुनर्वसनास विलंब झाला असल्याचे सांगून महसूल आणि वनविभागात समन्वय असल्याचे स्पष्ट केले. पर्याय एक व पर्याय दोनप्रमाणे पुनर्वसन होणार आहे. कृषी विभाग व बांधकाम विभागाने मूल्यांकन केलेले आहे. फक्त ते अंतिम होण्याचे बाकी आहे. पसंत केलेल्या जमिनी संबंधितांना दाखविणार आहे. संकलन यादीमध्ये दुरुस्ती ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्रुटी लक्षात येतील तशा त्या दुरुस्त्या केल्या जातील. चुका आम्ही सुधारू, असे आश्वासन प्रांताधिकारी तांबे यांनी दिले.

अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अखेर आंदोलनकर्त्यांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोयना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी हे कर्मचाऱ्यांसह आंदोलनस्थळी ठाण मांडून होते.