शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘ओव्हर’लोड चालकांची चूक पडली ५२ लाखांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:32 IST

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन ...

सातारा : कोरोनानंतर घराबाहेर पडलेल्या वाहन चालकांची बेफिकिरी समोर आली आहे. कोणी ‘ओव्हर’ लोड, तर कोणी विनापरवाना वाहन चालवून नियमाचे उल्लंघन करत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायू वेग पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा वाहन चालकांकडून एका महिन्यात तब्बल ५२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यावरूनच वाहन चालक किती बेफिकीर आहेत, हे दिसून येते.

कोरोनामुळे गत सहा महिने अनेकजण घरात कोंडून होते. कसलेही व्यवहार सुरू नव्हते. मात्र, लॉकडाऊन शिथिली झाल्यानंतर अनेकजण कामानिमित्त बाहेर पडले. पण रस्त्यावर वाहन चालविताना अनेकजण नियमांचे उल्लंघन करतच सुटले. नित्यनियमाने कारवाई करणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्यानंतर या पथकाने महामार्गावर विविध ठिकाणी तपासणी केंद्र उभारून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली. अनेक वाहने धोकादायक पद्धतीने चालविण्यात येत होती, तर काही विनापरवाना प्रवासी वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या पथकाने कोणाचीही गय न करता कारवाईचा बडगा उगारला. अनेक वाहन चालकांनी आपल्या चुकीची किंमत म्हणून एका महिन्यात तब्बल ५२ लाख उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत भरले आहेत. केवळ वाहन चालकांच्या चुकीमधून एक महिन्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

एवढ्या मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम पाहून वाहन चालकांकडून मोटार नियम कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचे या निमित्ताने समोर येत आहे. त्यामुळेच अपघातातही वाढत झाली आहे. बेफिकीर चालकांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. नियम पाळून वाहन चालविले तर ना दंड द्यावा लागेल ना कारवाईला सामोरे जावे लागेल. स्वत:चा अन् दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे. या दृष्टीने प्रत्येक वाहन चालकाने विचार करणे गरजेचे असल्याचे मत वायू वेग पथकातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. चालतंय चालू द्या, अशी भूमिका ठेवून अनेक वाहन चालक मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करत आहेत. असे वाहन चालकच या पथकाच्या हाती लागत आहेत.

चौकट : रात्री होतायत सैरभर!

महामार्गावर अनेक वाहनचालक विशेषत: रात्रीचे सैरभैर होत आहेत. त्यामुळे वायू वेग पथक नियम डावलणाऱ्या अशा वाहन चालकांवर लक्ष ठेवून असते. ओव्हरलोड वाहन चालविण्याचे प्रकार तर रात्रीचे सर्वाधिक घडत आहेत. परिणामी सर्वाधिक महसूल हा रात्रीचा जमा होत आहे.

कोट : वाहन चालकांनी मोटार नियम कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. परिणामी अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागतो. हे कुठेरी थांबायला हवे.

विनोद चव्हाण,

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा