शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

Coronavirus Unlock : लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:57 IST

नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.

ठळक मुद्दे लॉकडाऊननंतर बाहेर पडलेत निसर्ग साथी, केवळ माणूस बदललाअन्नसाखळीतील खेकडे, बेडूक अन् जळू दिवाळीपासून होते नैसर्गिक अधिवासात

लक्ष्मण गोरेबामणोली : नवनवीन शोध, तंत्रज्ञानामुळे माणसाची जीवन शैलीच बदलली. परंतु निसर्ग बदलला नाही. निसर्गापेक्षा कोणीही मोठा नाही हे कोरोना, निसर्ग चक्रीवादळाने दाखवून दिले. कोरोनानंतर माणसाने स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले. याच निसर्गातील अनेक जीवजंतू ऋतूमानानुसार काही कालावधीसाठी लॉकडाऊन होत असतात. बामणोली परिसरातील खेकडे, जळू यांचा लॉकडाऊन संपला आहे.खेकडे व जळू हे पावसाळा संपल्यावर पूर्णपणे गायब होत असतात. मग हे प्राणी कोठे राहतात, असा प्रश्न पडतो. खेकडे उन्हाळा सुरू होण्यापूर्वी ओढे, ओहोळेतील दगडाखाली दूरवर जमिनीत खोल बीळ करून राहतात. मान्सून सुरू होताच ते पुन्हा बाहेर येतात.खेकड्यांमध्ये तांबडे खेकडे व काळे खेकडे असे दोन प्रकार असतात. तांबडे खेकडे हे उंचीवरील प्रदेशात म्हणजेच जांभा दगड असणारे महाबळेश्वर, कास पठार, ठोसेघर परिसरात आढळतात. काळे खेकडे सपाट सखल प्रदेशात म्हणजेच काळा दगड असणाऱ्या तापोळा, बामणोली, सातारा, परळी, कऱ्हाड अशा ओढे नदीकाठी आढळतात.

या खेकड्यांच्या मादी या पावसाळा सुरू होताच कवचातील पिल्ले पाण्यात वाढीसाठी सोडतात. त्यांनी या पिल्लांची निर्मिती उन्हाळ्यात करून ठेवलेली असते. खेकड्यांसोबत प्रकट होणारा जळू कीटक आहे. जळू माणूस व जंगली प्राणी, जनावरांचे रक्त पितो. माणसांच्या पायाला चावून अशुद्ध रक्त पितो. त्यामुळे अनेक पाश्चात्य वैद्यकीय उपचारांमध्ये जळू पकडून त्याद्वारे मेडिकल थेरपी केली जाते. रक्त पिलेल्या कित्येक पट रक्तस्त्राव त्या ठिकाणाहून होतो.जळू ही दलदल असणाऱ्या ठिकाणी पालापाचोळा कुजलेल्या ठिकाणी आढळते. उन्हाळ्यात ती मृत अवस्थेत आढळते. वणवा गेला तरी जमिनीवरील गवत मात्र जळते; परंतु जळूला काहीही इजा होत नाही. पाऊस पडताच जळू लगेच जिवंत होते. भांबवली कासचा दलदलीचा परिसर, महाबळेश्वर, वासोटा, ठोसेघर या परिसरात जळू मोठ्या प्रमाणात आढळतात.काही मानवी वस्त्याही अलिप्तप्राण्यांप्रमाणेच काही गावे व मानवी वस्त्या आजही अलिप्त राहतात. जावळी तालुक्याच्या पश्चिमेकडील तळदेव मायणी व देऊर ही ठोसेघर पठाराला लागून असलेली दोन गावे तसेच मालदेव व रवदी मुरा येथील एका कुटुंबांची वस्ती वीज, रस्ता मोबाईल यांची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. निव्वळ पाणवठ्याची सोय असल्याने ही गावे अतिदुर्गम ठिकाणी वास्तव्य करत आहेत.

टॅग्स :environmentपर्यावरणSatara areaसातारा परिसरwildlifeवन्यजीवCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक