शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हेरगिरीदवारे केंद्र सरकारकडून लोकशाहीचा खून : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 11:37 IST

Prithviraj Chavan Satara : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी सडेतोड टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

ठळक मुद्देहेरगिरीदवारे केंद्र सरकारकडून लोकशाहीचा खून : पृथ्वीराज चव्हाण राणेंचे वक्तव्य संस्कृतीला काळिमा फासणारे

सातारा : देशामध्ये सरकारविरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवर पाळत ठेवून हेरगिरी करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनेच इस्त्राईलमधील एका खासगी कंपनीकडून हे सॉफ्टवेअर खरेदी केले. मात्र, सरकार कुठलेही स्पष्टीकरण करत नाही. ही हेरगिरी म्हणजे लोकशाहीचा खून आहे, अशी सडेतोड टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.येथील विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, ह्यकेंद्रातील भाजप सरकारने सांविधानिक संस्थानं ताब्यात घेऊन लोकशाहीला मारक निर्णय घेतले आहेत. या माध्यमातू्न हुकुमशाही चालविली आहे. इस्त्राईलकडून हेरगिरीचे पॅगेसेस सॉफ्टवेअर खरेदी करण्यात आले आहे. हे स्वाफ्टवेअर केवळ सरकारला विकत असल्याचे संबंधित कंपनीने स्पष्ट केले तरी केंद्र सरकार हे मान्य करायला तयार नाही. भारतातील तब्बल १००० व्यक्तींच्या मोबाईलमध्ये हे सॉफ्टवेअर घुसवण्यात आले आहे. त्यातील वरिष्ठ पत्रकार, सरकारी अधिकारी, न्यायाधीश अशा ३०० जणांचे मोबाईल तपासले गेले आहेत. याबाबत सरकारने स्पष्टीकरण केले पाहिजे.ह्णकेंद्र सरकारने हे नियमानं व परवानगी घेऊन केलेले नाही. नागरिकांवर पाळत ठेवण्याची ही पध्दत निषेधार्ह असून या बाबीची सर्वपक्षीय समिती नेमून अथवा न्यायाधिशांमार्फत स्वतंत्र तपास होणे आवश्यक आहे, अशी मागणी आ. चव्हाण यांनी केली.राणेंचे वक्तव्य संस्कृतीला काळिमा फासणारेकेंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचाही आ. चव्हाण यांनी समाचार घेतला. ह्यराजकीय जीवनामध्ये सभ्यता पाळावी लागते. राजकारणात कोणीही कोणाचा वैयक्तिक शत्रू नसतो. टीका करायची तर विचारानं करावी, मुख्यमंत्र्यांबाबत एकेरी भाषा वापरणे म्हणजे राज्यातील जनतेचा अपमान आहे. तसेच ही भाषा महाराष्ट्राला संस्कृतीलाच काळिमा फासणारी आहे.ह्ण

 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसSatara areaसातारा परिसरNarayan Raneनारायण राणे