शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो फूट बोअर मारूनही हातात कोरडी मातीच !

By admin | Updated: March 18, 2016 23:57 IST

भीषण टंचाई : कुसूर परिसरात तीन गावांसह आठ वाड्या तहानलेल्या; मार्चमध्येच चाललीय वणवण भटकंती--खोल-खोल पाणी !

गणेश काटेकर -- कुसूरकऱ्हाड-पाटणच्या हद्दीवरील डोंगर कपारीत वसलेल्या तारुख गावच्या वाड्या-वस्त्यांमध्ये दोन महिन्यांपासून पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाल्याने आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. परिणामी पिण्याच्या पाण्यासह पाळीव जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. कऱ्हाड तालुक्यातील कुसूर, कोळेवाडी, तारुखसह परिसरात बामणवाडी, वानरवाडी, पवारवाडी, शिबेवाडी, चाळकेवाडी, कारंडेवाडी, खड्याचीवाडी आदी वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्यावर कुसूर, कोळेवाडी, तारुख आणि इतर वाड्या-वस्त्या डोंगर पायथ्याशी वसल्या आहेत. या वाड्यांना गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासलेले आहे. तारुख गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर वांग नदी पात्राशेजारी असल्याने सध्यातरी पाणीटंचाई भासत नाही. मात्र नदीपात्रातील पाणीसाठा पूर्ण संपुष्टात आल्याने नदी कोरडी ठणठणीत झाली आहे. परिणामी, काही दिवसांत तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. कुसूर आणि कोळेवाडी या गावांच्या काही अंतरावरून वांग नदी वाहत असली तरी या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी नदीपात्रापासून दूर असल्याने विहिरीतील तळ दिसू लागले आहेत. कोळेवाडी येथील विहिरीत एका बोअरवेलमधून पाणी उचलून चार दिवस साठा करून गावात पिण्यासाठी सोडले जात आहे. तर कुसूर गावाला आठ दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. वानरवाडीसह बामणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या सर्व वाड्या डोंगर पायथ्यालगत वसल्या आहेत. बामणवाडी, चाळकेवाडी, खड्याचीवाडी, शिबेवाडी, कारंडेवाडी आणि पवारवाडीसाठी वेगवेगळ्या तीन विहिरींतून पिण्याचे पाणी पुरविले जाते. मात्र, तिन्ही विहिरींना पाणी नसल्याने आठ दिवसांतून एकदा विहिरीत उपलब्ध झालेले पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे. वानरवाडी विहीर पाझर तलावाशेजारी असल्याने सध्या पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही. मात्र, बारमाही पाणी असलेल्या वानरवाडी पाझर तलावाची पाणी पातळी प्रथमच कमालीची घटली आहे. त्यामुळे तलावाचा तळ दिसू लागला आहे. बोअर मारूनही हाती भुसापाण्याची तीव्र टंचाई भासू लागल्याने विहिरीतील गाळ काढणे, पाणी स्त्रोत शोधण्यासाठी आडवी बोअर मारणे, उभी बोअरवेल पाडून पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू आहे. मात्र, भूगर्भातील पाणी पातळीच खालावल्याने या प्रयत्नांनाही यश येत नसल्याचे दिसते. पाझर तलावाला गळतीकुसूरसह परिसरातील वाडी-वस्तीमध्ये उसाला प्राधान्य दिले जायचे; मात्र गत काही वर्षांपासून पाण्याच्या कमतरतेमुळे या विभागात ऊसपीक घेतलेच जात नाही. विहिरी, बोअरवेल कोरडे पडल्याने शेतीला पाणी आणायचे कोठून, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. बामणवाडी आणि कारंडेवाडी येथे पाझर तलाव आहेत. मात्र ते गळतीमुळे असूनही नसल्यात जमा आहेत. पावसाळ्याचे प्रवाह आटत असताना या तलावातील पाणीसाठाही संपुष्टात आला आहे.