शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

ओसाड माळरानावर गुलछडी फुलली

By admin | Updated: October 6, 2015 00:43 IST

फलटण तालुका : चार शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

आदर्की फलटण तालुक्याच्या दुष्काळी भागात धोम-बलकवडी प्रकल्पाचे पाणी आल्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे मोठे शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी ऊस, कांदा या पिकांकडे वळला आहे. सासवड येथील रमणलाल अनपट या तरुण शेतकऱ्याने चार शेतकऱ्यांना एकत्र करून ६० गुंठ्यात गुलछडीचे पीक घेऊन बाजारपेठही मिळवून दिली आहे.सासवड, ता. फलटण हे फलटण पश्चिम भागातील महत्त्वाचे गाव. अगदी देशाचे माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, फलटण संस्थानचे अधिपती मालोजीराजे निंबाळकर यांनी भेट दिलेले गाव; पण सासवड गावास पाणी मिळणे म्हणजे दिव्य स्वप्नच होते. त्यामुळे पाण्यासाठी सासवड गाव ११ वाड्या-वस्त्यांवर विखुरले गेले.परंतु गत दोन वर्षांपासून धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून ओढ्यामार्फत सासवडपर्यंत पाणी पोहोचले आहे.दुष्काळी भागात पाणी आल्याने अनेक शेतकरी ऊस, कांदा, मका पिकांकडे वळले; परंतु मंजुरीमुळे व शेतीमालाला हमी भाव नसल्यामुळे शेतकरी तोट्यात जाऊ लागला; परंतु सासवड येथील गोकूळनगर येथील रमणलाल विनायक अनपट याने पदवी घेऊन सुनील धुमाळ, सुधाकर अनपट यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज सासवड ते सातारा ६० किलोमीटर दुचाकीवर प्रवास करताना सातारा मार्केटमध्ये येणारी गुलछडीचा विचार करून स्वत: रमणलाल अनपट व सुभाष अनपट, ज्ञानेश्वर अनपट, जिजाबा अनपट यांनी एकत्र येऊन पिंपळगाव, ता. दौंड येथून गुलछडीचे कंद आणून प्रत्येकी १५ गुंठ्यांप्रमाणे ६० गुंठे क्षेत्रावर लागवड केली. रमणलाल अनपट यांनी विहिरीतील पाण्यात क्षार जास्त असल्याने जर्मन तंत्रज्ञान असलेली व ६३ हजार खर्चून क्षार विघटन करणारी मशीन बसवली आहे. त्यांनी ठिबक व बेडवर गुलछडी लागवड केली आहे. गुलछडीचे दर बाजारात कमी जास्त होत असतात. त्यामुळे त्यांनी वर्षभर गुलछडीचा दर व्यापाऱ्यांकडून प्रतिकिलो ८० रुपये ठरवून घेतल्याने शेतकरी वर्गास फायदा होत आहे. रासायनिकला सेंद्रियचा उताराआम्ही रासायनिक शेताला फाटा देत सेंद्रिय शेती व झिरो बजेट शेती करण्यास प्रारंभ केला आहे. देशी गोमूत्र व शेण शेतीसाठी वापरल्याने माल बाजारात उठावदार दिसत आहे. पारंपरिक शेती करताना नोकरी, व्यवसाय, शेतीचा मेळ घालत गुलछडीची लागवड केली. यावर्षी गणपती व गौराई सणावेळी ५०० रुपये किलो गुलछडीचा दर झाला होता; परंतु आम्ही हमी भाव घेतल्याने प्रामाणिक राहून त्याच भावात दिल्याने व्यापारी वर्गालाही दर वाढवून दिला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची समूह शेती व बाजारपेठेचा अंदाज घेऊन शेती केल्यास फायदेशीरच ठरते. - रमणलाल अनपट, सासवडसासवड (गोकुळनगर) येथील गुलछडी शेती व शेतकरी जिद्दीने काळ्या आईची सेवा केली तर ती लेकरांना भरभरून देते असे म्हणतात. सासवड (गोकुळनगर) येथील गुलछडीची शेती करणाऱ्या रमणलाल अनपट यांच्या बाबतीत हे खरेही ठरले. अनपट यांच्या कष्टाचे सोने झाले आहे. शेतात जोमाने वाढणारे त्यांचे कष्ट बघण्यासाठी परिसरातील शेतकरी त्यांच्या शिवाराला भेट देवून त्यांच्या कष्टाचे आणि जिद्दीचे कौतुक करतात.सूर्यकांत निंबाळकर