शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चकचकीत रस्त्यावरही ‘छान-छान खड्डे’

By admin | Updated: May 14, 2015 00:29 IST

माची पेठेजवळील स्थिती : पाण्याचे व्हॉल्व्ह उघड्या अवस्थेत; खड्ड्यामुळे पादचाऱ्यांपुढेही संकट

सातारा : माचीपेठेतून शनिवार पेठेकडे येणाऱ्या मार्गावर पालिकेच्या वतीने डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या उतारावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही ठिकाणी पाण्याचे व्हॉल्व्ह उघड्या अवस्थेत आहे. या व्हॉल्व्हमुळे रस्त्यात सुमारे एक फूट लांबीचे खड्डे पडले असून, नवीन डांबरीकरणाने हे खड्डे अधिकच खोल झाले आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस पडत नसल्याने दुचाकी वाहने घसरण्याच्या घटना वाढत चालल्या आहे.शहरात गेल्या काही दिवसांपासून पालिकेच्या वतीने डांबरीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. या कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, माची पेठेतूून शनिवार पेठेकडे येणाऱ्या तीव्र उतारावर असणारे खड्ड्यांमुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पाण्याचे व्हॉल्व्ह आहे. हे व्हॉल्व्ह नेहमी सुरू केले जातात. यानंतरच परिसरात पाणीपुरवठा होतो.तीव्र उतार असल्यामुळे काही वाहनधारकांच्या रस्त्यात असणारे हे खड्डे नजरेस पडत नाही. त्यामुळे अनेकदा दुचाकी या खड्ड्यांमध्ये आदळते. काही वेळेस नियंत्रण न राहिल्याने दुचाकीस्वार घसरून जखमीही झाले आहेत. डांबरीकणापूर्वी या खड्ड्यांची उंची कमी होती. मात्र, नुकतेच डांबरीकरण करण्यात आल्याने या खड्ड्यांची उंची आणखीनच वाढली आहे. त्यामुळे दुचाकीधारकांबरोच या परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी हे खड्डे नजरेस पडत नसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने या खड्ड्यांवर लोखंडी अच्छादन लावून वाहतुकीस येणारे अडथळे दूर करावे, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)रस्त्यात असणाऱ्या या खड्ड्यांमुळे वाहनधारकांबरोबरच नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. दिवसा धोका नाही मात्र रात्रीच्या वेळी या मार्गावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना जर हा खड्डा दिसला नाही, तर गंभीर इजा होवू शकते. त्यामुळे या खड्ड्याची लवकर डागडूजी करणे गरजेचे आहे.- अमोल बाबर, नागरिकअसाही तात्पुरता उपाययेथे असणाऱ्या एका खड्ड्यामध्ये संबंधित कर्मचाऱ्यांकडून उपायोजना म्हणून दगडी टाकण्यात आली आहे. व्हॉल्व्ह सुरू करण्यापूर्वी ही दगडी काढली जातात व बंद करताना पुन्हा दगडी टाकून खड्डा बंदिस्त केला जातो. तात्पुरता उपाय करण्याऐवजी यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.माचीपेठेतून शनिवार पेठेत प्रवेश करतानाच तीव्र उतारावर तीन खड्डे आहेत. हे खड्डे रात्रीच्या वेळी नजरेस पडत नाही. त्यामुळे दुचाकी अचानक खड्ड्यात जाऊन आदळते. प्रशासनाने या खड्ड्यांवर अच्छादन टाकणे गरजेचे आहे. - आनंद शेंडे, वाहनचालक