शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
2
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
3
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
4
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
5
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
6
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
7
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
8
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
9
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
10
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
11
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
12
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
13
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
14
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
15
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
16
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
17
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
18
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
19
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
20
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेवाडी नळपाणी योजनेत चार लाखांचा गैरव्यवहार

By admin | Updated: May 21, 2015 00:12 IST

ग्रामसभेत खडाजंगी : टेंडरची कागदपत्रे गायब; ठेकेदारांची वादावादी

पाटण : सन २०००-०८ मध्ये भारत निर्माण योजनेतून मंजूर झालेल्या शिंदेवाडी ग्रामपंचायतीच्या नळपाणीपुरवठा योजनेतील निधीमध्ये तब्बल चार लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे ग्रामसभेत उघडकीस आले. या योजनेचे काम करणारे दोन ठेकेदार आणि त्यांच्यातील देण्या-घेण्याच्या वादातून फायनल बिलाचा चार लाखांचा धनादेश गावच्या पाणीपुरवठा समितीने कोणाला दिला? हेच समजले नाही. या योजनेच्या टेंडरची फाईल तत्कालीन ग्रामसेवकाने गायब केल्याचे सध्याच्या ग्रामसेवकाला तब्बल ५ वर्षांनी लक्षात आल्यामुळे भर ग्रामसभेत ग्रामसेवकने कपाटातील दप्तर उपसले; मात्र फाईल सापडली नाही. या विषयावरून शिंदेवाडीच्या अनेक तरुण ग्रामस्थांनी ग्रामसेवक, ठेकेदार व पाणीपुरवठा अधिकाऱ्यास धारेवर धरले.शिंदेवाडीची ग्रामसभा सरपंच राजाराम पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी झाली. नळपाणी योजनेच्या कामातील निधीमध्ये गैरव्यवहार असल्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तालुका उपअभियंता आर. व्ही. पाटील हे उपस्थित होते. तत्कालीन सरपंच नंदा शिंदे आणि ग्रामसेवक यादव यांच्या कारकिर्दीत शिंदेवाडीची ३७ लाखांची नळ योजना मंजूर झाली. २००८ मध्ये शंभूराज देसाई यांनी भूमिपूजन करून कामास सुरुवात झाली. मात्र, गावच्या पाणीपुरवठा समितीने या कामासाठी बाबासाहेब देटके आणि विष्णू मोरे हे दोन ठेकेदार नेमले.या दोघांनी नळ योजनेचे काम केले. मोरणा नदीवरून पाणी उचलून ते गावापर्यंत न्यायचे, अशी योजना होती. मात्र, या कामाचा शेवटचा चार लाखांचा धनादेश ग्रामपंचायतीने कोणाला दिला, ती रक्कम मला मिळालेली नाही. याबाबत पोट ठेकेदार देटके यांनी तगादा लावला. देटके यांनी तत्कालीन पाणीपुरवठा उपअभियंता एस. ए. बारटक्के यांच्यावर आरोप करत ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा करण्याचा इशारा ग्रामसभेत दिला.मात्र, टेंडरची फाईल व त्यामधील दिलेले धनादेश गायब असल्यामुळे याबाबत काही सांगता येत नसल्याचे उत्तर ग्रामसेवक यांनी दिले. विहीर खुदाई, वितरणव्यवस्था व पाणी साठवण टाकी उभी करूनसुद्धा हे सर्व काम निकृष्ट झाल्याचा आरोप अनेक ग्रामस्थांनी ग्रामसभेत केला. (प्रतिनिधी)कार्यालयात या...आयोजित केलेली ग्रामसभा ठेकेदारांच्या भल्यासाठीच होती. यामध्ये शिंदेवाडीच्या ग्रामस्थांना काही देणे-घेणे नसल्याचे दिसून आले. अखेर ठेकेदार विष्णू मोरे यांना त्यांच्याकडील टेंडरची फाईल बाहेर काढली. आणि उपअभियंता आर. व्ही. पाटील यांच्याकडे दिली. शेवटी आर. व्ही. पाटील यांनी दोन ठेकेदार मोरे आणि पेटके जवळ बोलावून कानमंत्र दिला. आणि नंतर ‘आॅफिसमध्ये या,’ असा सल्ला दिला. आणि ग्रामसभा संपली.