शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पिके जगविताना शेतकऱ्यांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:38 IST

गेल्या सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमी कमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून विहिरीतील पाणीपातळी ...

गेल्या सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कमी कमी होत असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गेल्या दीड महिन्यांपासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू कमी होवू लागली आहे. तर महिन्यापूर्वीच रानावनात असणारे लहान-मोठे ओढे, नाले, बंधारे आटले असून चिमणीला पिण्यासही पाणी उरले नाही.

नदीवरून पाणीपुरवठा करून क्षेत्र ओलीताखाली आणलेल्या उपसावे जलसिंचन पाणी योजनांच्या क्षेत्रात असणाऱ्या विहिरींना बऱ्यापैकी पाझर होत असून सहा - सात तास चालत आहेत. एप्रिल महिना चालू झाल्यापासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत चालली असून अनेक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या विहिरींनी तळ गाठला आहे. दररोज कसाबसा एक ते दीड तासच विद्युत पंप चालत आहेत. महिन्यात पूर्णपणे विहिरी आटतील, अशी भीती शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.

माळरान व हलक्या प्रतीच्या जमिनीतील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी आभाळकडे डोळे लावून वळीव पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी उशिरा टोकण केलेले गहू, हरभरा पिके कसेबसे काढले आहे.आता ऊस पिकाला पाणी मोठ्या प्रमाणात लागत आहे. भरपूर पाणी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस पिवळा पडत आहे. चालू वर्षी मे महिना सुरू होण्यापूर्वीच विहिरी तळ गाठतील, अशी भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

कोट

चालू वर्षी एप्रिल महिन्यातच विहिरींना दणका बसला असून दोन तासांवर विहीर आली आहे. पाऊस सुरू होईपर्यंत पिके जगविणे अवघड झाले आहे. वळीव पाऊस पडला तर पिके जगतील नाहीतर अवघड परिस्थिती आहे.

सागर शेडगे

शेतकरी

विहे शेडगेवाडी