शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील आंदोलनात शेतकरी बदनाम झाला : थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST

पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष ...

पत्रकात म्हटले आहे की, देशातील राजकीय विरोधी पक्ष हे शेतकरी आंदोलनाच्या आडून मोदींसह सरकारवर प्रहार करीत आहेत. विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढण्याचा प्रयत्न करीत आहेत. विरोधी पक्षांना शेतकरी आंदोलनातून तोडगा निघावा, शेतकऱ्यांचे भले व्हावे असे वाटते का? वाटत असेल तर महाराष्ट्रातील शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी व इतर पक्षांच्या पुढाऱ्यांनी शांत बसावे. शेतकऱ्यांचा वैचारिक गोंधळ उडवू नये. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व डाव्या पक्षांनी शेतकरी आंदोलनात बोलणे व शेतकऱ्यांचा कळवळा घेण्याचा अधिकार केव्हाच गमावला आहे. कारण देश स्वतंत्र झाल्यापासून ६० वर्षे तुम्हीच राज्य केले आहे. स्वामिनाथन आयोगाचा अहवाल २०११ साली येऊनही तुम्ही तो राबविलेला नाही. शेतकऱ्यांच्या आजच्या दुरवस्थेला ७० ते ८० टक्के तुम्ही जबाबदार आहात. तसेच केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय राबविले पाहिजेत. कार्पोरेट कंपन्या, मोठे व्यापारी, शहरी ग्राहक यांचे हितरक्षक अशी केंद्र सरकारची प्रतिमा होत चालली आहे. अर्धबळ सैनिक तैनात करण्यापेक्षा शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी नवे मंत्री, अधिकारी नेमावेत. लवकरात लवकर तोडगा काढावा.

ट्रॅक्टर रॅली, त्यातील हिंसा, पोलिसांवरील दगडफेक हे पाहिल्यावर शेतकऱ्यांच्या व्यथा कोण ऐकूण घेणार? त्यासाठी शेतकरी नेत्यांनी शेतकरी आंदोलनातील भूमिकेचा फेरविचार करावा, असेही पत्रकात म्हटले आहे.