शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुका घ्यायला कर्मचारी मिळतायत, प्रकल्पग्रस्तांना जमिनी वाटपाला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:40 IST

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप ...

सातारा : कोरोनाच्या महामारीमुळे कोयना धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर पूर्ण करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले १ मे रोजी वाटप सुरू करण्याचे निर्देश पाळता येत नाहीत तर निवडणुका कशा काय घेतल्या जातात आणि यासाठी मनुष्यबळ कोठून व कसे आणले जाणार, असा सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी जिल्हा प्रशासनासमोर उभा केला आहे.

६०-६५ वर्षे उद्ध्वस्त केलेल्या कोयना धरणग्रस्तांनी लढून मिळवलेला विकसनशील पुनर्वसनाचा हक्क कोरोना महामारीच्या कारणाने अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवला जात आहे. कर्मचारी नाहीत म्हणून सांगितले जात आहे. मग कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीला कर्मचारी कसे काय उपलब्ध होणार आहेत. जर उपलब्ध होणारच असतील तर कोरोना महामारीचे काय असा सवाल प्रकल्पग्रस्त जनता विचारत आहे, असे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले आहे.

सातारा जिल्हाधिकारी यांनी ही कृष्णा कारखान्याची निवडणूक रद्द करावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा. आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनाही आमचा सवाल आहे, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

खरे तर प्रकल्पग्रस्तांचे काम करणे हे कार्यालयात बसून गर्दी न करता करण्याचे काम आहे, यासाठी बाहेरून लोक किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावे लागणार नाहीत, असे असताना कोरोनाचे कारण देऊन हे काम थांबवले जाते, व दुसऱ्या बाजूला मात्र कृष्णा कारखान्याची निवडणूक जाहीर करून ती घेण्याचा घाट घातला जातो हे कशाचे द्योतक आहे. या निवडणुकीत सभा होणार, मिरवणूक निघणार, पर्यायाने गर्दी होणार याला मात्र कोरोनाचे नियम लागू नाहीत, यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि प्रकल्पग्रस्तांचे काम करताना कोरोना आढवा येतो याचे लॉजिक जनतेला समजले नाही, असेही डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.

तुझे आम्हाला पत्र दिले तसे निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे का?

कोयना धरणग्रस्तांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत दिलेले निर्देश पाळले जात नाहीत म्हणून कोयना धरणग्रस्त आपल्या गावागावात बेमुदत आंदोलन सुरु केले. त्याबाबतीत जिल्हाधिकारी यांनी कोरोना महामारीच्या कारणामुळे आंदोलनापासून परावृत्त व्हावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे पत्र आम्हाला दिले आहे. मग या निवडणुकीबाबत हे प्रशासन शासनाला पत्र लिहून निवडणूक पुढे ढकलण्याविषयी काही हालचाल केली आहे का? असाही सवाल डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केला आहे.