शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न सत्यात उतरणार

By admin | Published: September 22, 2014 10:15 PM

माणिकराव साळुंखे : भाऊराव पाटील जयंती सोहळ्यात दिली माहिती

सातारा : शाहू-फुले-आंबेडकर यांच्या शैक्षणिक कार्याची प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्था निर्माण केली. कर्मवीरांनी पाहिलेले ग्रामीण विद्यापीठाचे स्वप्न संस्थेच्या शताब्दीपर्यंत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत आशादायक घटना आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १२७ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन अ‍ॅड. रावसाहेब शिंदे होते. यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. अनिल पाटील, प्राचार्य आर. के. शिंदे, शहाजी डोंगरे, अ‍ॅड. के. व्ही. पाटील, अ‍ॅड. दिलावर मुल्ला, प्राचार्य नानासाहेब गायकवाड उपस्थित होते.डॉ. साळुंखे म्हणाले, ‘रयत शिक्षण संस्था ही भारतीय शिक्षण व्यवस्थेची मातृसंस्था असून देशाच्या प्रगतीचा दर ठरविण्याचे पायाभूत कार्य कर्मवीर अण्णांच्या कार्यामुळे घडले. शिक्षण हे नाविन्याचा शोध घेणारे असावे. केवळ माहिती देणारे शिक्षण पुरेसे नसून कौशल्यावर आधारित शिक्षणपद्धती असावी.’अ‍ॅड. शिंदे म्हणाले, ‘संस्थेने विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. बीपीओच्या माध्यमातून तसे शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आहे. तोच रयत शिक्षण संस्थेचा गाभा असून भविष्यात ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना असे शिक्षण दिले जाणार आहे.’ कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत संस्थेचे सचिव प्राचार्य गणेश ठाकून यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले. सहसचिव प्राचार्य डॉ. दीनानाथ पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)