शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे जिल्ह्यातील ८५० हेक्टरवरील पिकांवर अवकळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नजरअंदाजे ८५० हून अधिक हेक्टरला बसला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात सहा दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका नजरअंदाजे ८५० हून अधिक हेक्टरला बसला आहे. यामध्ये कमी-अधिक फरकाने सुमारे १७०० शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, तर सध्या पंचनाम्याचे काम सुरू असून बुधवारपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नुकसान क्षेत्राचा आकडा समोर येणार आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाला, पण पावसाबरोबरच मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या. यामुळे पिके आणि फळांचे नुकसान झाले. या पीक नुकसानीचे पंचनामे सुरू झाले आहेत. कृषी सहायक, ग्रामसेवक आणि तलाठ्यांच्या माध्यमातून पंचनामे करण्यात येत आहेत. आतापर्यंत नजरअंदाजे ८५८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान, तर १ हजार ७४० शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील खटाव तालुक्यात सर्वाधिक पीक नुकसान झालेले क्षेत्र आहे. या तालुक्यात नजरअंदाजे नुकसान क्षेत्र ७७९ हेक्टर आहे. यामध्ये ज्वारी आणि गहू पिकाचेच नुकसान झालेले आहे. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १ हजार ५६२ आहे. फलटण तालुक्यात अंदाजे ४८ हेक्टरचे नुकसान आहे, तर शेतकऱ्यांचा आकडा १०७ आहे. या तालुक्यातही ज्वारी आणि गहू पिकांचेच नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर वाई तालुक्यात २५ हेक्टर क्षेत्र बाधित असून शेतकऱ्यांची संख्या ४८ आहे. वाई तालुक्यातही ज्वारी आणि गव्हालाच फटका बसलाय. कोरेगाव तालुक्यात ४.५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान आहे, तर महाबळेश्वर तालुक्यात २ हेक्टरवरील स्ट्रॉबेरी फळाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

कोट :

जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. खटाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे नजरअंदाजे समोर आले आहे. बुधवारपर्यंत पंचनाम्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर खऱ्याअर्थाने पीक नुकसानीचा आकडा समोर येईल.

- गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा

.......................................................