शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

पाठबळाअभावी धोक्याची घंटा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 22:53 IST

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचे विधानसभेसाठी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिमतपूरमध्ये येऊन जर कोणी स्वत:च्या सोयीसाठी भाजपाच्या आश्रयाला गेला तर त्याला जनता माफ करणार नाही, असे स्पष्ट सुनावले. त्यामुळे प्रदेश काँग्रेस ...

जयदीप जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्करहिमतपूर : कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेसचे नेते धैर्यशील कदम यांचे विधानसभेसाठी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रहिमतपूरमध्ये येऊन जर कोणी स्वत:च्या सोयीसाठी भाजपाच्या आश्रयाला गेला तर त्याला जनता माफ करणार नाही, असे स्पष्ट सुनावले. त्यामुळे प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या पाठबळाअभावी कदम यांची रणनिती काय राहणार, याकडे लक्ष लागले आहे.पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेसची सत्ताधारी सरकारविरोधात जनसंघर्ष यात्रा सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील यात्रेच्या नियोजित मार्गामध्ये प्रारंभी रहिमतपूरचा समावेश नव्हता. आमदार जयकुमार गोरे व धैर्यशील कदम यांच्या प्रयत्नामुळे रहिमतपूर येथे जनसंघर्ष यात्रा आली. यावेळी रहिमतपूर नगरपरिषदेसमोर झालेल्या जाहीर सभेमध्ये धैर्यशील कदम यांनी राज्यातील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या समोर ‘आम्ही कुणालाही टक्कर देऊ; परंतु प्रदेश काँग्रेस, जिल्हा काँग्रेस आमच्या पाठीशी ताकदीने उभी राहिली पाहिजे,’ असे आवाहन केले. त्यांच्या या वाक्यावरून प्रदेश काँग्रेस व जिल्हा काँग्रेस त्यांना ताकद देत नसल्याचे स्पष्ट होते. काँग्रेस पक्ष जिल्ह्यात वाढला पाहिजे, फुलला पाहिजे, यासाठी या मतदारसंघात काँग्रेसच्या विचाराचे पाच जिल्हा परिषद सदस्य काम करत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आठ ते नऊ हजार मतांच्या फरकाने आमचा पराभव झाला आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघावर बारकाईने आपण लक्ष ठेवावे. या विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विचाराचा एक आमदार तुमच्या सोबतीला महाराष्ट्रात येऊ शकतो, असा विश्वास धैर्यशील कदम यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये ‘भाजप सरकारला सत्तेतून घालवायचे आहे, एवढा एकच उद्देश रहिमतपूरकरांनी डोळ्यासमोर ठेवावा. स्वत:च्या सोयीसाठी जर कोणी भाजपच्या आश्रयाला गेला तर जनता व पुढची पिढी त्यांना माफ करणार नाही,’ अशा शब्दांत चव्हाण यांनी आपले मत स्पष्ट सांगितले.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शनात सातारा जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिकेमध्ये आपले उमेदवार निवडून आले पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ज्या-ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची जशी ताकद आहे. त्याप्रमाणे वरिष्ठ पातळीवर उमेदवारीबाबतचा निर्णय घेतले जातील, असे स्पष्ट केले. एकीकडे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. मात्र दुसरीकडे धैर्यशील कदम यांच्यासारख्या ताकदवर उमेदवाराला पक्षाकडूनच ताकद दिली जात नाही, असेच संबंधितांच्या वक्तव्यावरून दिसून येते. सध्या काँग्रेस पक्षांमध्ये जो-तो स्वत:च्या भातावरच डाळ ओढण्याचा प्रयत्न करत असून, स्वत:चे अस्तित्व जपण्याच्या प्रयत्नात इतरांचा मात्र बळी जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. कºहाड उत्तर विधानसभा मतदारसंघात धैर्यशील कदम यांनी गत निवडणुकीत ५८ हजार मते मिळवली. त्यानंतर वर्धन अ‍ॅग्रो कारखान्याची निर्मिती केली. त्याच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात दंड थोपटून उभे राहणार आहेत. मात्र, पक्षाकडून पुरेसे पाठबळ मिळत नसल्यामुळे अस्वस्थता वाढत आहे.वैर पक्षासाठी घातक...काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील अन् धैर्यशील कदम यांच्यात वारंवार खटके उडत आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आनंदराव पाटील यांनी धैर्यशील कदम यांची उनी-दुनी काढल्यामुळे कदम प्रचंड संतापले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेचे कºहाड विश्रामगृहात आयोजन केले होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोनमुळे धैर्यशील कदम यांनी पत्रकार परिषद रद्द केली. पृथ्वीराज चव्हाणांच्या बरोबरच्या बैठकीनंतरही आनंदराव पाटील व धैर्यशील कदम यांच्यातला तणाव निवळला नाही. त्यामुळेच जिल्हाध्यक्ष रहिमतपूर येथील जनसंघर्ष यात्रेत सहभागी झाले नाहीत. दोघांतील विळ्या भोपळ्याचे वैर काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी घातक ठरू शकते.