शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
2
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
3
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
4
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
5
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
6
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
7
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
8
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
9
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
10
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
12
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
13
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
15
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
16
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
17
IPL 2026 : ...तर MS धोनीला फेअरवेल मॅचही मिळणार नाही? रविचंद्रन अश्विनचा मोठा दावा
18
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
19
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
20
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या महसूल विभागाची कोटीची उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:13 IST

दरम्यान, सरकारच्या तिजोरीत वेगळ्या पद्धतीने कऱ्हाडच्या महसूल विभागाने भूखंड विक्री आणि दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. तसेच ...

दरम्यान, सरकारच्या तिजोरीत वेगळ्या पद्धतीने कऱ्हाडच्या महसूल विभागाने भूखंड विक्री आणि दंडात्मक कारवाईची रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला. तसेच गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व साठाप्रकरणी कोट्यवधी रुपये दंडात्मक आकारणी केलेली रक्कम येणे बाकी असताना, त्याची वसुली जोरदारपणे सुरू आहे.

शेरे येथील विस्तारित गावठाणमधील शासकीय मोकळ्या भूखंडांचे जाहीर लिलाव उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांच्या मान्यतेने तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. यावेळी नऊ मोकळ्या भूखंडांचे एकूण क्षेत्र ३ हजार १०० चौरस मीटरचा जाहीर लिलाव करण्यात आला आहे. भूखंडाचे शासकीय मूल्यांकन प्रति चौरस मीटर १ हजार २६० रुपये असून यावेळी एकूण ६८ इच्छुकांनी लिलाव बोलीत सहभाग घेऊन सर्वोच्च बोलीनुसार लिलाव महसूल विभागाने दिला आहे. यावेळी शासनास एकूण १ कोटी ६२ लाख १० हजार रुपये महसूल विभागाला प्राप्त होणार असून एकूण लिलावाच्या २५ टक्के रक्कम ४० लाख ५२ हजार ५०० रुपये महसूल विभागाकडे जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम जमा होणार आहे. उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी महसूल विभागाकडील दंडात्मक प्रलंबित प्रकरणांतून वसुली मोहीम सुरू केली आहे. याला कऱ्हाड तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असून शासनाच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा दंड जमा होऊ लागला आहे.

लिलाव बोलीत अनेकांनी सर्वाेच्च बोली केली. त्यामध्ये शिवाजी रंगराव पवार यांनी १९ लाख २५ हजार, अमोल प्रल्हाद निकम १८ लाख ३५ हजार, पोपट यशवंत निकम १९ लाख १० हजार, शंकर बाळासोा निकम १८ लाख ७५ हजार), समीर मुबारक शिकलगार १८ लाख १५ हजार, जयवंत पांडुरंग सावंत २२ लाख १० हजार, काकासाहेब कृष्णा निकम ११ लाख, दीपक नानासोा निकम १४ लाख ३५ हजार, नजीर महंमद नदाफ २१ लाख ५ हजार असे एकूण ९ जणांकडून एकूण १ कोटी ६२ लाख १० हजार रुपये महसूल विभागाकडे जमा होणार आहेत.

- चौकट

...तर भूखंड होणार सरकारजमा

कऱ्हाड तालुक्यातील सर्व गावांतील विस्तारित गावठाण भूखंडाचे शर्तभंग झालेल्या व्यवहारांचा शोध घेऊन बाजारमूल्याच्या ७५ टक्के रक्कम भरून घेऊन शर्तभंग नियमित न केल्यास हे भूखंड सरकारजमा करण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली.