शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यात गावपातळीवर सोयीच्या आघाड्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष ...

वाई : राज्यात तीन पक्षांचे सरकार विरुद्ध भाजप असे समीकरण असून, राज्य पातळीवरील नेते सर्व निवडणुकांमध्ये आघाडीचे घटक पक्ष एकत्र लढणार, असे म्हणत असले, तरी ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक परिस्थिती पाहून समीकरणे बदलताना दिसत आहेत. गावापातळीवर मुख्य प्रबळ असलेल्या पक्षाच्या विरोधात बाकीचे पक्ष एकत्र येऊन लढताना दिसत आहेत. यामध्ये राज्य पातळीवरील आघाडीला तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे.

वाई तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या २४२ वॉर्डमधील ६०६ जागांसाठी एकूण १ हजार १५१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीत १२ ग्रामपंचायतींतील १८ अर्ज बाद झाले होते. तालुक्यातील १९ पूर्णतः बिनविरोध झाल्या असून, ५७ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक लागली आहे. निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमध्येही काही गावांमध्ये काही वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. तालुक्यात अनवडी, उलुंब, वेलंग, बोपेगाव, दसवडी, कनूर, कोंढवली, वयगाव, जांब, जोर, किरुंडे, परतवडी, वाशिवली, शेलारवाडी, वेरुळी, वासोळे, मुंगसेवाडी, खावली आणि अनपटवाडी आदी गावे बिनविरोध झाली असून, उरलेल्या ५७ ग्रामपंचायतींमध्ये मतदान १५ जानेवारी रोजी होणार आहे.

निवडणूक होणाऱ्या गावांमध्ये महाविकास आघाडीचा फॉर्म्युला कोठेही वापरताना दिसून येत नाही. बावधन हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जात असले, तरीही बावधनमध्ये भाजप-शिवसेनेमध्ये युती झाली असून, राष्ट्रवादी विरोधात शिवसेना-भाजप लढत असून, काँग्रेस पक्ष तटस्थ भूमिकेत आहे, तर परखंदीत राष्ट्रवादीची भाजपसोबत युती झाली असून, काँग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली आहे. परंतु काँग्रेसचे विराज शिंदे यांचे पारडे जड आहे. केंजळमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी सरळ लढत आहे. पसरणीत राष्ट्रवादीत दोन गट पडले असून, एका गटाने भाजपबरोबर युती केली असून, आरपीआयने एका वाॅर्डात बंडखोरी करून तीन उमेदवार अपक्ष म्हणून उभे केले आहेत. चिखलीमध्ये विकास शिंदेंच्या काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी व शिवसेनेची युती झाली असून, चिखलीतील तीन वाॅर्डपैकी दोन वाॅर्ड बिनविरोध झाले आहेत. एका वाॅर्डमध्ये निवडणूक लागलेली आहे. मेणवली ग्रामपंचायतीत काँग्रेसने जुळवून घ्यावयाचा प्रयत्न केला होता; परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे मेणवली ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादी विरुध्द काँग्रेस अशी सरळ लढत आहे.

चौकट..

राष्ट्रवादीचे पारडे जड... भाजपची कडवी झुंज, तर काँग्रेससाठी अस्तित्वाची लढाई

इतर गावांतील ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडीच्या फाॅर्म्युल्याला तिलांजली देत स्थानिक आघाड्या करीत चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. उर्वरित ५७ ग्रामपंचायती निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, १८ जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. आमदार मकरंद पाटील यांचे तालुक्यातील निवडणुकीवर बारीक लक्ष असून, आजमितीला वाई तालुक्यात राष्ट्रवादीचे पारडे जड आहे. भाजपने राष्ट्रवादीशी कडवी लढत दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची लढाई आहे.