शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील नाले तुंबल्याने उपमार्ग जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:34 IST

मलकापूर ते आटकेटप्पा परिसरात महामार्ग रूंदीकरणावेळी सहा ठिकाणी ओढ्यांमधील पाण्याच्या प्रवाहासाठी मोऱ्यांची निर्मिती केली आहे. महामार्ग व उपमार्गालगत दोन्ही ...

मलकापूर ते आटकेटप्पा परिसरात महामार्ग रूंदीकरणावेळी सहा ठिकाणी ओढ्यांमधील पाण्याच्या प्रवाहासाठी मोऱ्यांची निर्मिती केली आहे. महामार्ग व उपमार्गालगत दोन्ही बाजूला सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाले खोदले आहेत. मात्र, या नाल्यात टाकलेला कचरा व मुख्य ओढ्यांवर झालेले अतिक्रमण यामुळे ठिकठिकाणी नाले तुंबले आहेत. मलकापूर येथेही भारत मोटार्ससमोर गटरचे घाण पाणी रस्त्यावर पसरल्याने तलाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, तर नाल्यातील घाण रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या परिसरातील बहुतांशी ओढ्यांवर अतिक्रमण झाले आहे. मोऱ्यांमध्ये कचरा टाकून तुंबल्याने ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अनेक ठिकाणी रस्त्यावरूनच प्रवाहित झाला आहे.

पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही नांदलापूर येथे जखीणवाडी ओढा उपमार्गावरूनच वाहत आहे. या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची पोती टाकली आहेत. कचऱ्याने मोऱ्या तुंबल्या आहेत. अशा तुंबलेल्या मोऱ्या रिकाम्या करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक ओढे व नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. अनेक भुयारी नाल्यात कचरा अडकल्याने नाले ठिकठिकाणी तुंबले आहेत. त्यामुळे उपमार्ग जलमय झाले आहेत.

- चौकट

स्थानिकांचा विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास

उपमार्गावर पाणी साचल्यामुळे स्थानिकांना नाइलाजास्तव आपला जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बरेच दिवस उपमार्गावर साचलेल्या पाण्यातूनच ग्रामस्थांना ये-जा करावी लागत असून, संबंधित विभाग गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच ठिकठिकाणी उपमार्गावर धोकादायक खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत. उपमार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

फोटो : १७केआरडी०२

कॅप्शन : नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे नाले तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी उपमार्गावर साचत असून, या मार्गावरून स्थानिकांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. (छाया : माणीक डोंगरे)