शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

लावला ‘भंडारा’... अन् फिरला वारा !--सातारनामा

By admin | Updated: October 17, 2014 22:52 IST

वाईत आवई : फलटण फिक्स; पण ‘माण-खटावात कोण रेऽऽ भाऊ?’

सातारा : ‘राम-लक्ष्मण’ जोडीनं कैक वर्षे जिल्ह्याचं राजकारण स्वत:च्या ताब्यात ठेवलं. ‘पाडापाडी’च्या राजकारणात मशहूर असलेल्या या जोडीला, यंदा मात्र आपलीच माणसं निवडून आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. म्हणूनच ‘फलटणचा निकाल स्पष्ट’; पण वाईमध्ये ‘हातातल्या घड्याळा’चं भवितव्य खंडाळ्यातल्या भंडाऱ्यावर अवलंबून. असाच प्रकार ‘माण-खटाव’मध्येही !दुष्काळी माण-खटावात ‘जयाभाव’ नं किती पाणी आणलं, माहीत नाही; पण इथं यंदा ‘पैशाचा पाऊस’ अन् ‘मतांचा महापूर’ दिसला. सुरुवातीला ‘गोरे’ की ‘पोळ’ अशी चर्चा होती, शेवटच्या टप्प्यात मात्र ‘कोणता भाऊ’ हाच सवाल विचारला गेला. ‘जयाभाव’नं आणलेल्या पाण्यापेक्षाही मुंडे-जानकरांची भावनिक साद ‘छोट्या भावा’साठी ‘लई भारीऽऽ’ ठरली. इथं ‘भंडारा’ गावोगावात चालला. सर्वात धक्कादायक म्हणजे, मायणीसारख्या गावातही मोठ्या आवडीनं ‘कपबशी’तून ‘मोदींचा चहा’ पिला गेला. ‘गुदगेंचं तात्याप्रेम’ (की जयाभाव द्वेष?) काही त्यांच्याच लोकांना पचनी पडलं नाही म्हणे. वडूज-दहीवडीत ‘जयाभाऊंचा हात’ दिसला असला तरी म्हसवडसह बाकीच्या वाड्या-वस्त्यांमध्ये म्हणे ‘कपबशी’चा खणखणाट. खटाव तालुक्यात ‘हरणाई’चा भोंगा चांगला वाजला. आता विषय इतकाच की, खटावचे ‘भैय्या’ किती मतं खातात, यावरच माणच्या दोन ‘भाऊं’ंचा निकाल अवलंबून. अजितदादा किंवा रामराजे मोगराळे घाट चढून वर आले असते तर कदाचित ‘घडाळ्याचे काटे’ अधिक गतीनं फिरले असते.फलटणमध्ये मात्र परिस्थिती एकदम वेगळी. लोकसभेपासून अत्यंत आक्रमक बनलेली ‘रणजित-दिगंबर’ जोडी ऐन विधानसभेला चिडीचूप का झाली, याचं उत्तर साऱ्यांसाठीच आकलनापलीकडं. कोणताही ‘शेतकरी’ परगावी जाताना पॅसेंजरचंच तिकीट काढतो; पण इथं या ‘स्वाभिमानी’ पठ्ठ्यानं म्हणे ‘अर्धा पेटी’चं ‘कन्फर्म तिकीट’ खरेदी केलं; अन् नंतर पुन्हा भरकटत गेलेली ‘बाबा एक्स्प्रेस’च पकडलेली. ‘तिकीट फेल’ गेल्याचं दु:ख जास्त की ‘गाडी’ चुकल्याचा पश्चाताप, हे आदरणीय दिगंबरावांनाच ठावूक. ट्रक भरून साड्या काय अन् टँकर भरून पाणी काय... सारंच मुसळ केरात गेल्याची रूखरूख लागलीय रावऽऽ.असो, लोकसभेत शिट्टी वाजल्यापासून शांत बसलेल्या रामराजेंचा खरा अवतार पुन्हा दिसून आला. ‘पोपट, चिमण्या अन् घुबडां’चा खेळ रंगविणारे ‘प्राध्यापक’ महाशयच पुन्हा एकदा फलटणचे ‘रिंगमास्टर’ ठरले... पण ‘पाटणमधल्या पोपटां’चं अन् कऱ्हाडातल्या ‘प्रिन्सिपल’बाबांचं काय? ‘दक्षिण’ खिंड लढविण्यासाठी किती हुशारीनं ‘उत्तरेचा बळी’ कसा दिला गेला? वाचायलाच हवं, पण उद्याच्या अंकात! (क्रमश:)वाईत मदनदादा पाच वर्षे आमदार नव्हते. कारखान्यातूनही बाहेर कधी पडत नव्हते. (असं ‘आबा’ म्हणतात, आम्ही नव्हे!) यंदा निवडणुकीला ते उभं राहणार की नाही, हे महिन्यापूर्वी ठरत नव्हतं. ठरलं तेव्हा पक्ष कोणता असेल, हे कार्यकर्त्यांना ठावूक नव्हतं. अगदी उमेदवारी फॉर्म भरेपर्यंत सारेच अंधारात होते. अशा वातावरणात मकरंद आबांचं फावलं. बावळेकरांचंही भागलं. अर्ज माघारीपूर्वीच गावोगावच्या पारावर म्हणे, ‘आबांच्या लीड’ पन्नास हजारांवर पोहोचला... पण, मदनदादा भलतेच वस्ताद निघाले. आबांना बेसावध ठेवून त्यांनी शेवटच्या क्षणाला ‘गनिमी कावा’ केला. आबांची एकेक माणसं फोडून ते त्यांच्याच पट्ट्यात घुसले. फुटलेला माणूस पुन्हा परत आणण्यातच आबांची शक्ती खर्ची झाली. झेड्पीमुळं आबांचा ‘लोणंद गटाचा आनंद’ हिरावला गेला. गावा-गावांतील गटातटांचाही फायदा दादांनी पुरेपूर उचलला. सुरुवातीला अत्यंत किरकोळीत काढल्या गेलेल्या घटकांचाही ‘इगो’ जागा झाला. (उद्या ‘बावधन’मधला आकडा फुटल्यानंतर या वाक्याचा अर्थ लक्षात येईलच!) थोडक्यात, शेवटच्या टप्प्यात मदनदादा अकस्मात आक्रमक झाल्यानं चकित झालेल्या मकरंद आबांना आपली बरीच समीकरणं बदलावी लागली. अशातच ‘महाबळेश्वरचा एक गठ्ठा’ बावळेकरांच्या खिशात पडला; तर ‘खंडाळ्यात भंडारा’ लावला गेल्यानं पुरुषोत्तमांचं ‘कमळ’ बऱ्याच गावात फिरलं. त्यामुळं कुणा एकाच्या नावाची ‘वाईत आवई’ उठवणं, याक्षणी तरी खूप अवघड.सचिन जवळकोटे