शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
3
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
4
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
5
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
8
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
9
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
10
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
11
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
12
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
13
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
14
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
15
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
16
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
17
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
18
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
19
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
20
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या जगण्याला ‘बुडत्या’चा आधार

By admin | Updated: January 10, 2015 00:12 IST

तुटपुंजे अनुदान : अनुदान वाढविण्याची लाभार्थ्यांची मागणी

परळी : समाजातील निराधार, परितक्त्या, विधवा, अपंग तसेच दारिद्र्यरेषेखालील इतर घटकांना विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानामुळे निराधारांचे जगणे मुश्किल झाले असून, त्यांच्या अनुदान रकमेत शासनाने वाढ करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ योजना राज्य निवृत्ती वेतन, राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना आदी विविध प्रकारच्या सामाजिक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे एक लाख तीस हजार लाभार्थ्यांना अनुदान दिले जात. संजय गांधी निराधार योजनेचे ९८ हजार ६१५, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ९ हजार १४१, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे ७८७ तर ६१ अपंग लाभार्थ्यांच्या यात समावेश आहे. अनुदानाची रक्कम ४०० ते ६०० रुपये असून महागाईच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने लाभार्थ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना गोरगरिबांना खराखुरा आधार देणाऱ्या असायला पाहिजेत. या योजनांबाबत तळागाळापर्यंत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने परिश्रमपूर्वक काम केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. (वार्ताहर)

लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास संबंधित कुटुंबाने वर्षाच्या आत तहसील कार्यालयात या योजनेसाठी अर्ज केल्यास संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पुढे येत नसल्याने यासाठी आलेला निधी परत जात आहे. संबंधित लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.