शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी न देणाऱ्यांवर कारवाईबाबत आश्वासित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:39 IST

कराड : राज्य सरकार शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत मिळाली पाहिजे यासाठी आग्रही आहे. पण ,अनेक कारखान्यांनी ती दिलीच नसल्याने ...

कराड : राज्य सरकार शेतकऱ्यांना एफआरपी वेळेत मिळाली पाहिजे यासाठी आग्रही आहे. पण ,अनेक कारखान्यांनी ती दिलीच नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. मी त्यांना १ एप्रिल रोजी साखर आयुक्त यांच्याशी चर्चा करतो, आढावा घेतो, जे एफआरपी देत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आश्वासित केले आहे. मी दिलेल्या उत्तराने त्यांचे समाधान झाले आहे .असे मत राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी कराड येथे व्यक्त केले.

मंत्री पाटील म्हणाले, सहकारी साखर कारखानदारांनी चौदा दिवसात एफआरपी दिली पाहिजे असा कायदा आहे. मात्र अजूनही काही कारखानदारांनी ती दिलेली दिसत नाही. गतवर्षी एफआरपी न देणाऱ्या कारखान्यांचे प्रमाण ९५ टक्के होते. यंदा ते ८३ टक्क्यांवर आले आहे. याबाबत कारखानदारांकडून जी कारणे दिली जात आहेत, त्यात प्रामुख्याने साखरेचे मूल्य तीन हजार १०० रुपये आहे, पण त्या प्रमाणात साखर विक्री होत नाही. त्यामुळे काही कारखानदारांनी त्याचे हप्ते पाडले आहेत, तर काहींनी एफआरपी दिलेलीच नाही.

वास्तविक सहकारमंत्री या नात्याने मी नेहमीच पुणे येथील साखर आयुक्त कार्यालयात याबाबतचा आढावा घेत असतो. एफआरपी दिली नाही त्यांच्यावर आपण आरआरसीप्रमाणे कारवाई करतो. म्हणजे त्या कारखान्यांची साखर ताब्यात घेतो व जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत त्याची विक्री केली जाते. त्यातून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे दिले जातात .तशी कारवाई आपण यापूर्वीही केलेली आहे. यावर्षी सुद्धा संबंधितांना तशा सूचना केलेल्या आहेत.

ज्या कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही. त्या कारखान्यांवर गत वर्षीप्रमाणे कारवाई होणारच. मग ते कारखाने कोणाचेही असले तरी त्याचा विचार केला जाणार नाही. कारण शेतकऱ्यांना पैसे मिळणे महत्त्वाचे आहे, असेही मंत्री पाटील म्हणाले.

चौकट

माझ्या खात्याशी संबंधित प्रश्नावरच बोललो ..

शेतकरी संघटनेचे इतरही काही प्रश्न आहेत. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले असता मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, होय त्यांचा वीजबिलाचाही प्रश्न आहे. मी मात्र माझ्या खात्याशी संबंधित असणाऱ्या प्रश्नावरच प्रामुख्याने चर्चा केली आहे. पण शासनानेही वीजबिलाबाबत अनेक सवलत दिली आहे असेही त्यांनी सांगितले.

फोटो :आयकार्ड

बाळासाहेब पाटील