शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम जलसाठ्यांमुळे वृक्षराई, वन्यप्राण्यांना जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:30 IST

खंडाळा : पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही भविष्याची गरज ओळखून खंडाळ्यातील सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत. ...

खंडाळा : पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही भविष्याची गरज ओळखून खंडाळ्यातील सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत. खंबाटकी घाटातील जंगलात बांध घालून पर्यावरण संवर्धन करण्यासह वन्यप्राणी आणि पशुपक्ष्यांच्या पाण्याची व्यवस्था कृत्रिम जलसाठे तयार करून करण्यात आली आहे. या जलसाठ्यात पाणी साठविण्यासाठी तरुणाई मेहनत घेत आहे. त्यामुळे वृक्षराई व वन्यप्राण्यांना जीवदान मिळणार आहे.

बदलत्या काळात पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत आहे. मानवाचे जीवन सुसह्य करावयाचे असल्यास पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे, ही बाब लक्षात घेऊन खंडाळ्यातील विविध सामाजिक संघटनांच्या तरुणांनी एकत्र येऊन काही उपक्रम हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून खंबाटकी घाट परिसरातील हरेश्वर पायथ्याजवळील पुरातन भैरवनाथ मंदिर येथे श्रमदानातून दगडी बांध घालण्यात आले आहेत. खंबाटकी परिसरात प्रत्येक रविवारी श्रमदान करण्यासह बंधारे निर्माण करणे, वृक्षरोपण करणे, वन्यप्राण्यांसाठी वनतळी, वणवामुक्त घाट, प्लास्टिक हटाव हे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार या भागात ठिकठिकाणी वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे येथील वन्यजिवांना उन्हाळ्यातही तग धरून राहण्यास मदत होणार आहे. सध्या या पाणवठ्यावर असलेल्या कृत्रिम जलसाठ्यात प्रत्येक आठवड्यात पाणी भरून ठेवण्यासाठी तरुणाई काम करीत आहे.

(चौकट..)

वन्यजिवांसाठी आटापिटा .....

खंबाटकी घाट परिसरात झाडांच्या परिसरात जागोजागी वनतळी तयार केली असून, त्यासाठी छोट्या दगडांपासून व मातीपासून छोटी तळी तयार केली आहेत. त्या शेततळ्यांसाठी वापरले जाणारे प्लास्टिक कागद वापरून वनतळी केली आहेत, तर काही जागी सिमेंटची भांडी बसविली आहेत. त्यामध्ये बाहेरून कॅनने पाणी आणून ओतले जात आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची तहान भागत आहे.

(कोट..)

निसर्गाची हानी झाल्यामुळे पर्यावरण संतुलन बिघडले आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. जीव वाचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या भागातील पाणी सध्या आटले असल्याने पाण्याची कमतरता आहे. जंगल भागातील जलसाठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे हे उपक्रम हाती घेतले आहेत.

- संदीप ननावरे, पर्यावरणप्रेमी, हरेश्वर संवर्धन

०९खंडाळा

फोटो : खंबाटकी घाटात डोंगर भागात छोटे बांध व वनतळी तयार करून पाण्याची व्यवस्था केली आहे, त्यात पाणी भरताना तरुण जमले आहेत.